Search This Blog

Sunday, May 3, 2020

अनोळखी हे प्रेम - Part 5

       
     
             अभयला असं अचानक आलेला पाहून ऋतिकाला पहिल्यांदा काहीच सुचलं नाही. पण नंतर तो आलाय हेच खूप होतं  तिला. आपण अभयशी फक्त ह्या एक दोन भेटीत कसंकाय कनेक्ट होऊ शकतो ह्याचं तिला आश्चर्य वाटत होतं. ना ओळख ना पाळख किंवा आधी कधी बघितलंही नाही ह्याला कधी. मग याच्यासाठीच एवढी बेचैनी का?  का आपण त्याच्यासाठी एवढं करतोय? त्या दिवशी त्याचा ऍक्सीडेन्ट झालेला तर आपल्या जीवाची नुसती घालमेल चालू होती. आणि तोसुद्धा  ओळख असल्यासारखा वागत होता. खूप जुनी ओळख असल्यासारखा. जसा काही माझा जिवलग मित्रच आहे. पण हा कसा असेल माझा जिवलग मित्र. एकच होता माझा लहानपणीच जिवलग. विचार करता करता ऋतिकाला आपल्या लहानपणीच्या बेस्ट फ्रेंडची आठवण झाली. आयुष्याच्या धावपळीमध्ये ते लहानपणीचे सुखाचे क्षण कसे मुठीत धरलेल्या वाळूप्रमाणे निसटून गेले होते. परत कधी हातात न येण्यासाठीच. 

          'म्याऊ.  हो म्याऊच. आमच्या बाजूच्या बंगल्यात राहायचा. एकदम श्रीमंत. पण त्या श्रीमंतीचं काय नव्हतं त्याला एवढं.  माझा बालपणीचा जिवलग मित्र. मीच नाव ठेवलं होतं त्याचं. सारखा आपला मांजरींसोबत खेळात असायचा. म्हणून मीच लाडाने त्याचं नाव ठेवून दिलं होत. त्याला ते आवडायचं नाही. बोलायचा, काय मुलींसारखं नाव ठेवलंय माझं. पण मी त्याला त्याच नावाने हाक मारायचे. मग रागाने यायचा माझ्या मागे मला मारायला. पण नंतर त्याला पण सवय झाली त्याची. मग मी ह्या नावाने हाक मारल्याशिवाय तो ऐकायचा पण नाही. आणि हो त्याने काय नाव ठेवलं होतं माझं. चिऊ. हा तेच. तो म्याऊ आणि मी चिऊ. मॅचिंग नाव शोधून काढलं त्याने माझ्यासाठी. काय तर म्हणे मी चिमणीसारखी सारखं चिवचिव करत असते. कसे होतो ना आम्ही. एकदम निरागस. निःस्वार्थ मैत्री. त्याने कधीच मला एकटीला सोडून साधं चॉकलेट देखील खाल्लं नाही. मी आल्याशिवाय ते कव्हर सुद्धा काढायचा नाही तो. मी आले कि आधी मला देऊन मगच तो खायचा. मीसुद्धा आईने दिलेला शिरा आधी त्याला भरवूनच खायचे मी. प्रत्येक गोष्ट शेअरिंगने.

               आम्ही नेहमी सोबत असायचो. एकत्र शाळेत जायचो. एकत्र यायचो. शाळेत जायला मी रडायला लागले मला समजवायला यायचा आणि इवल्याश्या हाताने माझ्या इवल्याश्या डोळ्यातून आलेलं पाणी पुसायचा. मग काय जादूच. म्याऊसोबत चिऊ शाळॆत. मी एक वेळ आई बाबांचं ऐकायचे नाही. पण म्याऊ बोलला कि स्वारी तयार. होताच तसा तो. माझा जिवलग.

                पण नंतर त्याच्या आईवडिलांच्या ऍक्सीडेन्ट नंतर तो दिसलाच नाही. त्याच्या बंगल्यातपण नाही दिसला कधी. कोणीच राहत नव्हतं त्यांनतर तिथे.  कुठे गायब झाला अचानक काय माहित. दिसलाच नाही अजूनपर्यंत. किती शोधलं असेल त्याला आपण. पण कुठेच पत्ता नाही लागला आपल्यलाला. इव्हन सोशल साईट्सवर पण ट्राय केलं. पण तरीसुद्धा नाही भेटला कुठे. कसं भेटणार आपल्याला त्याचं खरं नाव तरी माहिती होतं का? सांगितलं होतं त्याने तेव्हा. पण कुठे लक्षात राहतंय एवढं. आपण तर म्याऊच बोलायचो त्याला. आता कुठे असेल तो ? काय करत असेल? मला ओळखेल का नाही भेटल्यावर, काय माहित? एवढेशे होतो आपण तेव्हा. गोबऱ्या गालाचा म्याऊ आता कसा दिसत असेल? आता पण तसेच असतील का त्याचे ते गोबरे गाल? छे छे! नसतील. आता तो मोठा झाला असेल. मस्त पेर्सनालिटी असेल त्याची आता. पण? असेल कुठे तो? म्याऊ....' विचार करत असताना ऋतिकाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं म्याऊच्या आठवणीने. तिच्या लहानपणीच्या जिवलग मित्राची तिला आज अचानक आठवण आली होती. तिचा लहानपणीच म्याऊ. इतके दिवस तिला तो विस्मरणात गेला होता. १० वर्षं झाली होती त्याला तसा गायब होऊन. तो तसा गेल्यानंतर थोडे दिवस ऋतिका खूप रडली होती तिच्या लाड्क्या म्याऊसाठी. पण नंतर जशी जशी ती मोठी होत गेली तशी इतर मित्रमैत्रिणींच्या गराड्यात ती हा म्याऊ विसरून गेली होती. या सगळ्या चांदण्यांत तिचा चंद्र कुठेतरी हरवला होता. कुठंतरी धुक्यांत विरून गेला होता.

           डोळ्यातलं पाणी पुसता पुसता तिला आणखी रडायला येत होतं. का आपण त्याला असं विसरून गेलो, म्हणून स्वतःलाच प्रश्न विचारत होती. एकच तर मित्र होता आपला तो, बाकी सगळे मतलबी आहेत. सगळे त्यांच्या कसल्या ना कसल्या फायद्यासाठी  आपल्याशी मैत्री करून आहेत. म्याऊला कसलाच स्वार्थ नव्हता. एकदा लहानपणी शाळेतून येत असताना तिची चप्पल कुणीतरी चोरली होती. येताना ऊन खूप होतं. तिचे पाय उन्हाने भाजत होते. हे बघून म्याऊने आपली बुटं काढून तिला घालायला दिली आणि स्वतः अनवाणी चालायला लागला. आणि त्याला ऊन्हाचा त्रास होतोय हे बघून आपण त्याची बुटं परत त्याच्या पायात घातली. परत अनवाणी चालायला लागलो. हे त्याला बघवलं नाही. मी बुटं घालत नाही आणि त्याच्याकडून हा त्रास बघवत नाही. करणार काय? पण ह्याने त्यावर उपाय शोधलाच. पट्ठ्याने मला पाठकुळी घेतलं आणि चालू लागला. प्रॉब्लेमच सॉल्व्हड. हे आठवून ऋतिका खुद्कन हसली. एवढ्याश्या म्याऊला मैत्री कळत होती तेव्हा आणि आपण ह्याच म्याऊला पूर्णपणे  विसरून गेलो होतो, म्हणून तिला तेवढंच दुःखही झालं. तिला स्वतःचाच राग आला.

             लहानपणीची मैत्री हि कधीच विस्मरणात जात नाही. कधी ना कधी ती आठ्वतेच. ऋतिकाला सुद्धा तिचा लहानपणीचा म्याऊ अचानक आठवला होता. पण त्याला शोधणार कसं? इतक्या दिवसांत नाही भेटला कधीच तो. कदाचित तोही आपल्यासारखाच  विसरला असेल का मला? असा ऋतिकाला प्रश्न पडला. नाही नाही. तो नाही विसरू शकणार आपल्याला. कदाचित विसरलादेखील असेल. नाहीतर एव्हाना भेटला असता तो परत मला. ऋतिकाचं मन खट्टू झालं. तिला काहीतरी आठवलं. अचानकच तिला अभयची आठवण झाली. कदाचित आपला म्याऊ हा अभय तर नसावा. पण असं कसं शक्य आहे? त्याने ओळखलं असतं मला लगेच मी त्याची चिऊ आहे म्हणून. आणि तसंही म्याऊ हा खूप श्रीमंत घरातला होता आणि हा अभय अगदी साधाच वाटतोय. त्याची श्रीमंतीचं जाऊ दे. पण आपला म्याऊ मैत्रीमध्ये जास्त श्रीमंत होता. तो त्याच्या जवळपासही नाहीय.  म्याऊसारखा  एकही गुण नाहीय अभयकडे. छे छे. . . काय विचार करतोय आपण. आपला म्याऊ कुठे आणि हा अभय कुठे. पण मग अभयला पाहताच आपलं हृदय एवढं धडधडतं का? आणि त्याला बघूनच ते शांत होतं. तो जवळपास असला कि एक अनामिक ओढ खेचत असते मला सारखी त्याच्याकडे. हे नक्की काय आहे? काहीही असलं तर हा अभय आपला म्याऊ असू शकत नाही. आणि जर हाच आपला म्याऊ असला तर. तर काय? त्यानेच आधी आपल्याला ओळखलं असतं. अभयकडे बघून जराही वाटत नाही कि तो म्याऊ आहे म्हणून. नसेलच तो म्याऊ.

               ऋतिकाचं मन म्याऊच्या आठवणीत एवढं भिजलं होतं कि क्षणभर तिला हा कालपरवा अचानक भेटलेला अभयच तिचा म्याऊ वाटून गेला. अभयच म्याऊ आहे आहे असं तिचं अंतर्मन तिला सांगत होतं. पण त्याची पुष्टी तिला होत नव्हती. म्याऊबद्दल तिला खास आपुलकी होती पण अभयबद्दलची ओढही तिला गप्प बसू देत नव्हती. नक्की काय ते तिला कळत नव्हतं. म्याऊ कि अभय आणि म्याऊच अभय असं दुहेरी परिणाम तिच्या मनात उमटत होतं. शेवटी तिने गणपती बाप्पाला हात जोडून म्याऊला लवकरात लवकर आपल्याला भेटवायला सांगितले. आता गणपती बाप्पाच तिला ह्यातून बाहेर काढू शकत होते. इतकी वर्षे आपण त्याला विसरून गेलो होतो पण आता म्याऊची आठवण तिला अस्वस्थ करत होती आणि इकडे अभयबद्दल तिची अनामिक ओढ तिच्या मनात घर करत होती.  बात उस पुराने रिश्ते कि थी, जो इस दौर में पिछे छुट गया था. जैसे कि कोई नायाब हिरा फिरसे कोयले कि खान मे दफन हुआ हो. और उसे वापस ढुंढना हो. 



               दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी गाडीने एका प्रशस्त गेटमधून आत प्रवेश केला आणि आलिशान बंगल्याजवळ येऊन थांबली. तसे अभय आणि निखिल गाडीमधून खाली उतरले. निखिल तर आ वासून पाहतच राहिला.  बंगला नव्हताच तो राजमहाल होता. एखाद्या महागड्या मॅगझिनच्या मुखपृष्ठावर दाखवतात तसा. नेत्रदीपक. सहज नजरेत मावतच नव्हता. मान पूर्ण उजवीकडून फिरून डावीकडे वळली तरी संपत नव्हता एवढा आलिशान बंगला होता तो. पांढऱ्या रंगात असलेला तो महाल पाहून निखिलला वाटलं हा तो अमेरिकेचा व्हाईट हाऊस तर नसेल ना. त्याचा तसा आ बघून अभय हसला. म्हणाला,
"अरे निख्या, तोंड तरी बंद कर कि रे. का गिळून टाकतो बंगला एवढा मोठा आ वासून" असं म्हणून अभय आणखी हसायला लागला. तसा निखिल म्हणाला,
"काय रे अभ्या कोणाचं घर आहे हे? कुणाच्या बंगल्याजवळ घेऊन आलाय तू बाबा?"

"अरे हो. तुला सांगितलं होतं ना सकाळी आपण घरी चाललोय म्हणून. विसरलास का? मग घरीच आलोय ना आपण आता." अभयने सांगितले.

"काय बोलतोस अभ्या? हे तुझं घर आहे ? एवढा मोठा बंगला आहे तुझा. बंगला सोड राजमहाल आहे हा. आपण तर जिंदगीत कधी एवढा मोठा बंगला नाही बघितला कधी. साल्या त्या आमदाराचा पण बंगला एवढा मोठा नाहीय"

"हो माझं काय म्हणतोय साल्या आपलं म्हण. मी आणि तू काय वेगळा नाहीयेस. जो मेरा है वो तेरा है और व तेरा है वो मेरा. काय बोलतोस."

"साल्या ते सगळं जाऊ दे. एवढा करोडपती असून आणि एवढा मोठा बंगला राहायला असताना तू तिकडे एवढ्याश्या खोलीत कसं काय राहिलास रे? धन्य आहेस भाऊ तू." निखिल त्याला हात जोडत म्हणाला.

"हा ते सगळं बघू नंतर. आता आत येणारेस कि इथेच उभं राहून आणखी आ वासनारेस." अभय त्याच्या खांद्यावर हात टाकत म्हणाला.

"हा चल"

         निखिल तसेच डोळे मोठे करत तो महाल पहात होता. तिथली शानोशौकत बघत होता. आणि तसतसं मनातल्या मनात अभयबद्दल त्याचं मैत्रिप्रेम आणखी वाढत होतं. ते दोघे चालत चालत दारापाशी आले. पाठीमागून बॉबी अंकल त्यांच्या बॅगा सांभाळत येत होते. तिथं येताच एक तेजस्वी आणि खानदानी रुबाब पण तितकाच साधेपणा  असलेली वयस्कर स्त्री हातात निरंजनाचं ताट घेऊन त्यांच्या स्वागताला उभी होती. सोबत इतर नोकर चाकर होतेच. ती स्त्री आणि इतर जण अभयकडे कौतुकाने पाहत होते. त्या स्त्रीला पाहताच अभय स्मितहास्य करून तिच्या चरणी झुकला.

"आजी"

"आयुष्यमान भव् यशस्वी भाव्" गोड हसून त्यांनी अभयला आशीर्वाद दिला.

त्यांचा आशीर्वाद घेऊन अभयला बरं वाटलं. त्याचं बघून निखिलपण त्यांचा आशीर्वाद घ्यायला झुकला.

"आजी तू कशाला आलीस खाली बरं नसताना तुला. मी आलोच असतो ना तुला भेटायला तुझ्या खोलीत. आधीच तुझी तब्येत ठीक नाहीय. काल जसं बॉबी अंकल ने फोन करून कळवलं तुझी तब्येत ठीक नाहीय ते, तसं  मी आलो लगेच आज. आता नको काळजी करुस. मी आलोय तुझ्या जवळ आता." अभय आजीच्या जवळ जात म्हणाला.

"हो अभय. लेकरा तुला बघून खूप बरं वाटलं बघ. कालचा आजार कुठच्या कुठं पळाला बघ आज तुला बघितलं कि" आजी म्हणाली," चल दमला असशील प्रवासाने खूप. आत ये."

निखिलकडे पाहत आजी म्हणाली,
"तू निखिल ना? अभय सांगत असतो खूप तुझ्याबद्दल. ये बाळा आत." आजी म्हणाली आणि अभय, निखिल एकत्र आत आले. आता ह्याने कधी सांगितलं आपल्याबद्दल आजीला ह्याचा विचार करत तो सोबत चालत होता त्यांच्या. आतमधून तो महल बघून निखिल तर चक्रावूनच गेला होता. एवढी श्रीमंती तो पहिल्यांदाच बघत होता. त्याला अजून खरं वाटत नव्हतं हे. सगळं स्वप्नात बघितल्यासारखी त्याची रीऍक्शन होती. आजीला त्यांच्या बेडरूममध्ये सोडून अभय आणि निखिल अभयच्या बेडरूमकडे निघाले.

                  कालच्या अभयला आलेल्या कॉलचं आणि आज अचानक निघण्याचं कारण आता निखिलला कळलं होतं. आजीला बरं नाही हे पाहून अभय आहे तसंच सोडून आला होता सगळं. अभयने तर आधी  एकच सरप्राईज सांगितलं होतं आणि इकडे त्याला एकावर एक सरप्राईज भेटत होते. आणि खरंतर ऍक्चुअल सरप्राईज बाकी होतं त्याचं अजून. अभयच्या आजीला पाहून त्यालाही खूप छान वाटत होतं. एवढी श्रीमंत असून एवढी साधी असलेली माणसं तो प्रथमच पाहत होता. एवढा थाट असूनही कुठे जरादेखील गर्वाचा स्पर्श नाही. सगळंच अनोखं. नाहीतर साला तो आमदार. किती घमेंड आहे साल्याला. त्याच्या शंभरपट श्रीमंती आहे इथे. पण घमेंड जरासुद्धा नाही. सगळा राजदरबारी थाट होता इकडे आणि माणसंही राजपरिवारासारखीच. 

                      अभयच्या बेडरूममध्ये आल्यावर अभय फ्रेश व्हायला निघून गेला. तोपर्यंत निखिल त्याची बेडरूम न्याहाळत बसला. किती मोठी बेडरूम होती त्याची. अक्खा ३ बीएचके चा फ्लॅट बसेल त्या एकट्या बेडरूममध्ये. एवढ्या मोठया खिडक्या आणि त्यावर लावलेले पडदे हवेने उडत होते. हवा आणि उजेड भरपूर. तिथेच समोर गॅलरी कम टेरेस होता. म्हणजे गॅलरी नव्हतीच ती. टेरेस वाटावं एवढा मोठा स्पेस होता समोर. तिथे चारही बाजूने वेगवेगळ्या प्रकारची झुडपे लावून आणि खाली गवत अंथरून गार्डन सारखं तयार केलं होतं. आणि आतमध्ये एवढा मोठा गोल किंगसाईझ बेड. त्यावर मखमली बेडशीट्स आणि तितकीच मऊशार गादी. समोर एवढी मोठी स्क्रीन आणि स्पिकर्स. एका बाजूला पुस्तक भरून मांडणी होती तर एका बाजूला जिमचं थोडंसं साहित्य होतं. एका खिडकीच्या इथे कॉम्प्युटर लावलेला होता.

                        अभय आला तेव्हा निखिलला तसं बघून थोडंसं हसला आणि त्याला आवाज देत म्हणाला,
"निख्या, सगळं निरीक्षण करून झालं असेल तर जा आता फ्रेश होऊन ये."

"अभ्या. कसला भारी बेडरूम आहे बे तुझा. आईशपथ. एकच नंबर. हे सगळं बघून मी तर हैराणच झालोय कि तू हे सगळं सोडून कसं काय राहू शकलास बाबा तिकडे?"

त्याचा प्रश्न ऐकून अभयला हसायला आले. कारण जेव्हापसून अभयने त्याला आपल्याबद्दल सांगितलंय तेव्हापसून निखिल एकच गोष्ट सारखी विचारत होता.

"अरे निख्या. तुला सांगितलं तर सगळं. आणि ह्या बघतोय ना ह्या सगळ्या गोष्टी आजीने आता लावल्या असतील. कारण इतके दिवस तर नव्हतो मी इकडे.  जा आता फ्रेश होऊन ये. नंतर मग तुला तुझी बेडरूम भेटेल जा" अभय त्याला समजावत म्हणाला.

"मला पण भेटेल माझी बेडरूम?" निखिल आश्चर्याने म्हणाला. कारण स्वतःची बेडरूम तेही या महालामध्ये. भारीच एकदम.

"हो बाबा. जा आता लवकर ये फ्रेश होऊन. जाम भूक लागलीय मला. एकतर कालपासून कंटिन्यू प्रवास करतोय. आता भूक कंट्रोल नाही होत आहे मला."

"हा हा येतो थांब." निखिल उड्या मारतच पळाला.
           
                थोड्यावेळाने फ्रेश होऊन बाहेर आला तर अभय भिंतीवरल्या  एका फोटोकडे टक लावून बघत होता. आईवडिलांचा फोटो होता त्याच्या. तो बघताना त्याचे डोळे भरून आले होते.

"निख्या, खूप लहान होतो रे कळत सुद्धा नव्हतं धड. पहिलीदुसरीला असेन. तेव्हा सोडून गेले रे मला आईबाबा." असं म्हणून रडायला लागला. त्याला तसं पाहून निखिलने त्याला सावरलं. काय बोलायचं ते कळत नव्हतं. अभयला फक्त सांत्वन देऊ शकत होता तो. थोड्यावेळाने अभय स्वतःहूनच शांत झाला. तसं निखिल म्हणाला,
"आपल्या हातात काही नसतं रे अभय, नियतीच्या खेळापुढे कोणाचं काही चालत नाही. जे झालं ते आपण बदलू शकत नाही. पण जे आपल्या हातात आहे त्याची काळजी तर नक्की घेऊ शकतो. आजीची खुप काळजी घेऊ आपण."

"हो निखिल." अभय डोळे पुसत म्हणाला."कधी काय होईल याची काही गॅरंटी नसते रे म्हणून मी माझ्या आयुष्यातल्या सगळ्यांना जपत असतो. कोणी नाहीय जास्त माझं ह्या जगात. आजी आणि तूला सोडून." आणि उठून निघाला.

"मी आहे मित्रा तुझ्यासोबत" असं म्हणून निखिलपण त्याच्या पाठोपाठ निघाला त्याच्या खांदयावर हात टाकून.

            जाताना निखिलचं अचानक पुस्तकांच्या इथं ठेवलेल्या एका लहान फोटोफ्रेम कडे लक्ष गेलं. २ लहान मुलं गोड हसताना कोणीतरी त्यांचा फोटो काढला होता. त्याशिवाय ते निरागस हास्य कैद नसतं झालं त्या फोटोत. तो फोटो बघून निखिलने अभयला विचारलं,
"अभ्या, कोणाचा फोटो आहे रे हा? म्हणजे हि दोघे कोण आहेत फोटोतली"

अभयने मागे वळून बघितले. तो त्या फ्रेमजवळ गेला. ती फ्रेम उचलून हातात घेतली आणि क्षणभर तिच्याकडे पहिले आणि म्हणाला,
"हि चिऊ, माझं लहानपणीचं प्रेम आणि हा मी,  म्याऊ."

To be Continued in Part 6.....

Friday, May 1, 2020

अनोळखी हे प्रेम - Part 4

                 
              फायनल एक्झाम झाली. आता पुढे मास्टर्स करायचं होतं पण रिझल्ट येईपर्यंत वेळ होता. पुढे काय करायचं हे अभयने आधीच ठरवलं होतं. पण निखिलला आपण शिकलो तेवढंच खूप झालं असं वाटत होतं. आता रिझल्ट लागला कि, काही असो पास किंवा नापास त्याला बिझनेस स्टार्ट करायचा होता स्वतःचा. म्हणून तो आपला मजेत होता. घरी वडिलांना सांगून त्याने तसं भांडवल जमवायला सुरुवात केली होती. थोड्याच दिवसात तो एक हॉटेल सुरु करणार होता हायवेला. सुरुवातीला छोट्या हॉटेलपासून सुरुवात करून मग पुढे त्याच मोठं रेस्टोरंट बनवायचं होतं त्याला. निखिलचा प्लॅन अभयला माहित होता. पण अभय पुढे काय करणार आहे याची त्याला काहीच आइडिया नव्हती.  अभयचा वेगळाच काहीतरी प्लॅन होता, पण काय होता ते त्याला कळत नव्हतं. मागे अभय म्हणाला तसं काहीतरी असेल आणि ते त्याच्या सोबत गेल्यावरच कळेल म्हणून निखिल जास्त विचार नव्हता करत त्या गोष्टीचा. अभय आता परत घरी जायच्या विचारात होता. पण अभयचं घर वगैरे कुठे आहे याची निखिलला काहीच माहिती नव्हती. त्याच्या माहितीप्रमाणे अभयचं कोणीच नव्हतं. पण हेच खरं सरप्राईझ होतं निखिलसाठी. 

        अभयने निखिलला कॉल केला आणि त्याला जवळच्या टपरीवर बोलावलं. निखिलला यायला वेळ लागेल म्हणून अभयने चहा मागवला आणि तो पीत पीत विचार करू लागला.
'ऋतिका. खरंच यार कोण असेल हि मुलगी. तिच्यासाठी आपलं मन एवढं झुरत होतं. तिला एकदाच बघून आपली विकेट पडली होती. आणि हे हृदयाचं तर वेगळंच आहे साला. ती जवळपास असली कि स्वतःहून धडधडायला चालू होतं. कुछ तो बात है. पण काय ते समजत नाहीय. ना तिला आपण कधी भेटलो अगोदर ना तिने आपल्याला कधी पाहिलंय. तरीसुद्धा आम्ही दोघे एकमेकांना खूप जुने ओळखत असल्यासारखं वागत होतो त्यादिवशी. नशिबाने त्यादिवशी आम्ही तिकडे गेलो आणि ती भेटली तिथेच. नाहीतर देव जाणे काय काय करायला लागलं असतं तिला शोधण्यासाठी. पण आता ती भेटलीच आहे, तरी पुढे काय? तिने स्वतःहून तिचा मोबाईल नंबर तर दिलाय पण साला आपणच नाही अजून फोन केला. इतके दिवस झाले फोन करेन म्हणतो पण साला भीती वाटते. काय करू? करू का आता कॉल? पण यार एवढे दिवस झालेत ती काय म्हणेल? ओरडेल का? मुर्खा एवढे दिवस लागतात का एक फोन करायला? असं काहीतरी म्हणेल?पण ती का असं म्हणेल? आपण तिच्या लक्षात तरी असू का? नाही. असं कसं लक्षात नसू. तिच्या डोळ्यांत मी ती ओढ बघितलीय. ती एक जुनी ओळख बघीतलीय. त्याशिवाय का तिने दिला आपला नंबर? कदाचित तीसुद्धा वाट बघत असेल आपल्या फोनची. असू दे चल. आता होउदे काहीही. करतो कॉल तिला'  विचार करत त्याने खिशातला मोबाईल बाहेर काढला. पण अरे नंबर कुठाय? अरे देवा! असं म्हणत तो शोधायला लागला. खिसे चाचपडले. शेवटी पाकिटात घडी करून ठेवलेली तीन दिलेली ती चिट्ठी मिळाली. त्यातला नंबर डायल करत असताना त्याला तिने ती चिट्ठी देण्यासाठी केलेली धडपड आठवली आणि त्याला हसू आले. रिंग वाजून वाजून फोन कट झाला. परत एकदा अभयने ट्राय केलं. परत तेच. दोन वेळा फोन केला पण तिने उचलला नाही  म्हणून अभय मनातल्या मनात थोडा खट्टू झाला. काहीतरी कामात असेल किंवा अभ्यास करत असेल म्हणून तिचं लक्ष नसेल असं म्हणून स्वतःची समजूत काढत फोन खिशात ठेवला.


     एवढा वेळ झाला तरी निखिल कसा आला नाही म्हणून त्याने निखिलला फोन करायला घेतला तर तोच मागून निखिलने त्याला आवाज दिला.

"अभ्या.. "

 त्याचा आवाज ऐकून अभयने मागे बघितले तर निखिल तिथेच उभे राहून सिगारेटचा धूर सोडत होता. अभयने आश्चर्याने त्याच्याकडे बघितले.

"काय रे निख्या कधी आलाय तू? मला वाटलं अजून तू कसा आला नाहीस म्हणून तुलाच फोने करणार होतो मी." अभय म्हणाला.

"अबे साल्या, मला  येऊन अर्धा तास झाला इथे. तुझंच लक्ष नाहीय." निखिल म्हणाला.

"काय बोलतोस? मग मला नाही दिसलास आलेला ते?" अभयने त्याला विचारले.

"हो ना. अरे कसं दिसणार ना तुला. आमच्या वाहिनीसाहेबांच्या विचारात होतास ना तू." निखिल म्हणाला.

"हा बरं बरं. असू दे."

"काय विचार करत होतास रे एवढा साल्या."

"काय नाही रे. तिने दिलेला नंबर वर फोन केलेला मी आता. तेच करू का नको हा विचार करत होतो. खूप दिवस झाले तिला भेटलो नाही. म्हणून निदान फोन तरी करून बघावा म्हणून ट्राय करत होतो " अभयने सांगितलं.

"म्हणजे तू अजून कॉल नव्हता केलास तिला?" निखिलने प्रश्न केला.

"नाही म्हणजे जमलं नाही रे करायला." अभय म्हणाला.

"काय? अबे चुत्या आहेस का तू? साल्या एवढे दिवस झाले तुला तिने नंबर देऊन आणि तू आज कॉल करतोय तिला. आणि वरतून सांगतोय जमलं नाही म्हणून" निखिल रागात म्हणाला.

"हो अरे, विचार करत होतो करू कि नको ते" अभय आपला काय बोलायचं म्हणून बोलला.

"वा भाऊ, धन्य आहेस लेक तू. माझ्यासारखा असता तर त्याच दिवशी घरी पोचल्या पोचल्या पहिला फोन तिला केला असता. ती तिकडे वाट बघत बसली असेल तू फोन करशील तिला म्हणून आणि तू फुकणीच्या इकडे विचार करत बसलाय फोन करू का नको म्हणून."

"तस नाही रे निख्या, पण मला भीती वाटत होती तिला फोन करायची. म्हणून नव्हतो करत."

" कसली भीती रे साल्या? तिने स्वतःहून सांगितलं नंबर देऊन कॉल कर म्हणून आणि तू भितोय. गजब आहेस लेका तू."

"अरे हो. पण आज केलेला ना कॉल पण तिनेच नाही उचलला."

"हो. मग थोड्या वेळाने परत कर ना"

"हा करतो."

"कर पण नक्की. " निखिल म्हणाला "
  
       अभय अजून विचारात होता. त्याला तसं बघून निखिल परत म्हणाला,
"एक काम कर आता परत एकदा कर कॉल. बघू उचलते का ते."

      अभयने लगेच तिचा नंबर डायल केला.रिंग वाजत राहिली. यावेळी पण ऋतिकाने फोन नाही उचलला. अभय हिरमुसला. ते बघून निखिल म्हणाला,
"परत बघू करून नाहीतर जाऊन येऊ तिकडे, जिथे लास्ट टाईम भेटली होती तिकडे."

"हो चालेल." अभय म्हणाला.

"बरं सांग मला का बोलावलंय आज अचानक?"

"हा. मी म्हटलं होत तुला आठवतंय का, कि आपली एक्झाम झाल्यावर तुला माझ्यासोबत यायचं आहे म्हणून."

"हो . त्याचं काय? आताच जायचं आहे का?

"आता नाही. आपला रिझल्ट लागला कि जाऊयात दुसऱ्या दिवशी. कदाचित तुला थोडे दिवस राहावे लागेल माझ्यासोबत म्हणून घरी आताच सांगून ठेव म्हणजे काही प्रॉब्लेम नाही." 

"हा मग वेळ आहे ना त्याला. मला वाटलं आजच निघायचं म्हणतो कि काय? आणि घरचं टेंशन नको घेऊ तू. मी आधीच सांगून ठेवलंय अभयसोबत चाललोय म्हणून त्याच्या गावी. त्यामुळे ते नाही काय बोलणार मला."

"अच्छा बरं."

"हम्म.. आणि काय रे अभ्या काय सरप्राईझ आहे रे. तू बोलत होतास ते. म्हणजे तू ऋतिकाला पळवून वगैरे न्यायचा काय प्लॅन तर करत नाहीयेस ना?" निखिल संशयाने अभयकडे पाहत म्हणाला. "तू कसला पळवून नेशील फट्टू साल्या. साधा कॉल करायला एक महिना लावतोय" असं म्हणून निखिल हसायला लागला.

"अबे नाहि रे. हे असं करायची काही गरज नाही मला. वेगळा प्लॅन आहे माझा. फक्त तू ये माझ्यासोबत तुला कळेल आपोआपच" अभयने सांगितले.

"बरं ठीके बघू तेव्हाच मग."

         बोलत असताना अचानक अभयच्या फोनची रिंग वाजली. निखिल आणि अभय एकदमच फोनकडे बघायला लागले. नंबर अनोळखी होता. कारण ऋतिकाचा नंबर त्याने सेव्ह करून ठेवला होता मघाशीच. निखिलला वाटलं तिचाच आहे.

"काय रे तिचाच फोन आहे का?"

"नाही. तिचा नंबर सेव्ह आहे. हा दुसराच नंबर आहे कोणाचा."

"बरं बघ कोणाचा आहे मग" निखल म्हणाला.

    अभयने फोन कानाला लावला. तसा त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले आणि तो निखिलपासून थोडा लांब जाऊन उभा राहिला. पलीकडली व्यक्ती फक्त बोलत होती आणि अभय ऐकत होता. चेहरा तसाच स्थिर ठेवून त्याने सगळं ऐकून घेतलं आणि फोन कट केला. आणि परत निखिलजवळ आला. एकदम नॉर्मल होत त्याच्या बाजूला बसला.

"काय रे कोणाचा फोन होता? ऋतिकाचा ?"

"नाही." अभय थंड आवाजात म्हणाला.

"नाही ? मग कोणाचा होता" निखिल अभयकडे पाहत होता. कारण फोन ठेवला तरी अभयने काही सांगितलं नव्हतं.  

 "होता असंच जाऊदे ते. बोल तू" अभयने काहीच सांगितलं  नाही.

 "खरं सांग अभ्या, कोणाचा फोन होता आणि तू एवढा सिरिअस झालाय" 

"काय नाही. फक्त एवढं समज कि तुला सरप्राईज थोडं लवकरच मिळणार आहे, कारण आपण उद्या निघतोय."

"का? असं अचानक ? आणि नेमकं झालं तरी काय असं" निखिलने काहीतरी सिरिअस मॅटर आहे हे ओळखलं.

"सांगतो उद्या वाटेत जाताना. आता नको काही विचारूस" अभय म्हणाला. "चल निघुयात आता. उद्या सकाळी बॅग घेऊन ये. ७ वाजता भेट मला इथेच टपरीजवळ." आणि घाईघाईने निघून गेला.

     अभयला असं निघून गेलेला बघून निखिल काहीच बोलला नाही. कोणाचा फोन असेल? घरचा तर नसेल त्याच्या? पण तो अजून कधीच त्याच्या घरच्यांबद्दल काही बोलला नव्हता. इन फॅक्ट ते आहेत की नाहीत याबद्दलच त्याला डाउट होता. त्यामुळे हा फोन कोणाचा असेल आणि अभयला सिरिअस व्हायचं काय कारण असेल हे त्याला कळत नव्हतं. म्हणून आता उद्या तो काय सांगणार त्यावर सगळं अवलंबून आहे, असा विचार करून निखिल गप्प झाला . अभयला एवढं सिरिअस त्याने कधीच बघितलं नव्हतं याआधी. 


            दुसऱ्या दिवशी सकाळी निखिल बरोबर ७ वाजता टपरीजवळ हजर झाला. अभयला फोन करणार तेवढ्यात तो पण आला. कालचं टेंशन नव्हतं आज त्याच्या चेहऱ्यावर. उलट असा काही भाव होता चेहऱ्यावर त्याच्या, जो निखिल पहिल्यांदयाच बघत होता. जसं काय हा आपला अभय नव्हेच. त्याला असं बघून काय बोलणार एवढ्यात अभय जवळ पोचला त्याच्या.

"चल निघुयात. रेडी ना."

"हो. चल भिडू." निखिल म्हणाला

"चल." असं म्हणत अभय चालू लागला.

"अभ्या, साल्या काय चालत जायचं आहे का? बाईक कुठाय तुझी?" निखिलने त्याला तसेच चालत पुढे जाताना बघून म्हटले.

"आज बाईकने नाही जायचं. गाडीने जायचं." अभय गालातल्या गालात हसत म्हणाला.

"हो का? कुठल्या गाडीने जायचं रे साल्या? बस बीस ने मी नाही येणार पहिलेच सांगतोय." निखिल वैतागून म्हणाला. अभय तसाच पुढे चालत होता. थोडं पुढे आल्यावर टपरीजवळच्या बस स्टॉप वर येऊन थांबला. मागून निखिल त्याला शिव्या घालत येतंच होता.

          दोघेजण तिथे थांबल्यावर दोनच मिनिटात एक आलिशान पांढऱ्या रंगाची बीएमडब्ल्यू त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. कारचा ड्रायव्हर उतरला आणि त्याने अभयला एक सॅल्यूट मारला. आणि दरवाजा उघडून उभा राहिला. निखिलला काहीच कळलं नाही. तो तसाच त्या ड्रायव्हर कडे आणि अभयकडे आलटूनपालटून बघत होता. नक्की काय चाललंय हेच कळत नव्हतं त्याला. हि एवढी आलिशान कार कोणाची आहे आणि हा ड्रायव्हर अभयला एवढा सॅल्यूट वगैरे मारून त्याच्यासाठी दार उघडून उभा आहे. क्षणभर त्याला वाटलं हे खोटं आहे, पण हे खरं होतं. त्याला तसा बघून अभय हसू लागला.

"निख्या. चल कि लेका बस लवकर."

निखिल तसाच त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होता.

"अरे ये बघत काय बसलाय चल बस. म्हटलं होतं ना तुला कि आज बाईक ने नाही जायचं गाडीने जायचं म्हणून. आता बस चल लवकर." अभय गालातल्या गालात हसत म्हणाला.

" हो. मला वाटलं आपण बसनेच जाणार.  पण हे काय रे?हि कार कोणाची आहे? आणि हा ड्रायव्हर तुला सॅल्यूट वगैरे का मारतोय. काय गेम आहे अभ्या हा." निखिलला काहीच समजत नव्हतं काय चाललंय ते. 

"सांगतो सगळं तुला. आधी बस तरी गाडीमध्ये." असं म्हणून  अभयने त्याला गाडीत बसवले. "बॉबी अंकल ह्या बॅग घ्या प्लिज." असं सांगून अभयपण गाडीत बसला.

"होय छोटे मालक" म्हणून त्यांनी बॅग घेऊन मागच्या डिकीत ठेवल्या आणि आपल्या सीटवर येऊन बसले.

"चला छोटे मालक. मालकीणबाई आपली वाट बघतायत."

"हो बॉबी अंकल चला. पण जाताना आपल्याला मध्ये एका ठिकाणी थांबायचं आहे हा. सांगेन कुठे  ते."

"जी छोटे मालक." असं म्हणून त्यांनी गाडी स्टार्ट केली आणि ते निघाले. गाडी कधी स्टार्ट झाली आणि कधी चालायला लागली हे निखिलला कळलेदेखील नाही. एवढ्या आरामदायक गाडीमध्ये बसायची त्याची पहिलीच वेळ. वडिलांच्या अल्टो मध्ये तो फिरत आणि फिरवत होता पण एवढ्या आलिशान गाडीने पहिल्यांदाच. आणि ते हि अभयच्या. साधी बाईक असलेला अभय कधी पन्नास आणि शंभरच्या वरती त्याने पेट्रोल नाही टाकलं. त्याला हा बीएमडब्ल्यू चा ड्रायव्हर सॅल्यूट मारून छोटे मालक म्हणतोय, हे सगळं त्याच्या समजण्यापलीकडे होतं. म्हणून तर तो आणखीनच पेचात पडला कि नक्की भानगड काय आहे. आता फक्त तो अभय बोलण्याची वाट पाहत होता. 


      अभय निखिलची चलबिचल पाहून गालातल्या गालात हसत होता. शेवटी अभयने त्याला सांगायला सुरुवात केली.

"निखिल. तुला म्हटलं होतं ना कि एक सरप्राईझ आहे तुझ्यासाठी. चल तुला थोडक्यात सांगतो "

"हा, ह्याच्यापेक्षा पण आहे का अजून काय ?" निखिलने विचारले.

"लवकरच कळेल तुला ते. आपण माझ्या घरी पोचल्यावर."

"काय? तुझं घर ? तुला घर पण आहे का?"

"हो आहे. खूप लांब आहे पण इथून ते. आपल्याला एक दिवस लागेल पूर्ण तिकडे पोचायला."

"आणि घरचे?"

"आजी आहे फक्त" अभय हे सांगताना दुःखी झाला.

"हम्म." त्याचं असं बोलणं ऐकून निखिलने घरच्यांबद्दल काही आणखी विचारलं नाही.

"तुला कदाचित विश्वास नाही होणार पण मी सांगतो ते खरं आहे. माझे वडील एक बिजनेसमॅन होते. खूप मोठा फॅमिलीबिजनेस आहे आमचा. मी लहान असताना माझे आईवडिल एका कार ऍक्सीडेन्ट मध्ये गेले. तेव्हापासून आजीने मला सांभाळलं. आणि मी थोडा मोठा झाल्यावर मला शिक्षणासाठी इकडे पाठवलं. आजीने ठरवलं असतं तर तिने मला परदेशी पण पाठवलं असतं पण तिने नाही पाठवलं. कारण तिचा अट्टाहास होता कि मी इथेच शिकून मोठं व्हावं. आपल्या मातीमध्ये राहावं.  सामान्य माणसाचं जीवन काय असतं हे अनुभवावं. त्यांची सुखदुःखं समजावीत मला. त्यांचं जीवन कसं असतं हे जाणवावं.  आणि  सगळ्यांत महत्वाचं म्हणजे आजीने गरीब आणि श्रीमंतीचा भेदभाव माझ्या मनातून काढून टाकला. एवढी घरची श्रीमंती असून सुद्धा आजीला जरासुद्धा गर्व नव्हता त्याचा आणि तोच तिने मला कधीच होऊ दिला नाही. करोडो रुपयांची मालकी आहे पण आजीने दिलेल्या शिकवणीमुळे मी माझे पाय जमिनीवर ठेवू शकलो. आजीने दिलेल्या शिकवणीमुळे पैशांचा कधीच माज केला नाही. माणूस जाणायला शिकलो. पैशांपेक्षा माणूस मोठा आहे आणि त्याहीपेक्षा माणुसकी मोठी आहे हि आजीची शिकवण आहे. तेच शिकलो मी आणि इकडे राहून मला तुझ्यासारखा मित्रसुद्धा भेटला. तेच मी जर तिकडे राहिलो असतो तर कदाचित नसता भेटला. आणि जे काही शिकलोय आजवर, जे काही अनुभवलंय ते नसतं भेटलं. कारण पैसा तर खूप आहे रे पण तुझ्यासारख्या जीव लावणाऱ्या मित्रावर सगळं कुर्बान." अभय सांगत होता.

निखिल हे सगळं ऐकून शॉक्ड झाला होता. साला आपला मित्र अभ्या ज्याच्याकडे खायचे प्यायचे वांदे होते. तसली खटारा बाईक घेऊन यायचा तो आणि त्यात पण कधी शंभरच्यावर पेट्रोल नाही टाकलं कधी याने. कितीतरी वेळा मीच पेट्रोल टाकलंय याच्या बाईकमध्ये आणि हा साला एक करोडपती आहे. चहा प्यायला पण माझ्याच खात्यावर लिहून ठेवायचा. ट्रॅफिकवाल्याने पकडल्यावर पैसे जाऊ नये म्हणून मला बाईक चालवू देण्याची रिस्क घ्यायचा. एका छोट्याश्या होस्टेलवर राहत होता हा.  एवढं सामान्य कसा राहू शकला हा अभ्या? एवढ्या करोडोच्या संपत्तीचा मालक असूनसुद्धा एका दमडीचा घमेंड नाही साल्याला. त्याने कधी जाणवू देखील नाही दिला कि तो इतका श्रीमंत आहे ते. कधीच नाही. कॉलेजमध्ये पण स्कॉलरशिप वर शिकत होता. मनात आलं असतं तर हा तेच कॉलेज विकत घेऊ शकत होता. नव्हे अशे कितीतरी कॉलेज विकत घेऊन पाहिजे तेवढ्या डिग्र्या छापल्या असत्या त्याने. पण नाही. एकदम सामान्य राहिला तो इतके दिवस. माझ्यासारख्या मुलासोबत मैत्री करून मला आपला जिवलग यार करून टाकलं याने. जिंकलस मित्रा.


   दोघे शांत होते. अभय खिडकीच्या बाहेर बघत होता आणि इकडे निखिल आपल्या डोळ्यांत आलेले पाणी पुसत होता. आपण किती नशीबवान म्हणून अभयसारखा मित्र आपल्याला भेटला. त्याची असली श्रीमंती त्याच्या पैशांत नाही तर त्याच्या स्वभावात होती. जरी करोडोंचा मालक असला तरी त्यापेक्षा जास्त मौल्यवान होता अभय.

"अभय, साल्या काय हे?" 

"काय?" अभयने त्याच्याकडे पाहत विचारले.

"एवढं सगळं लपवलंस साल्या माझ्यापासून तू?"

"हम्म. अरे निख्या तुला जर सगळं आधीच सांगितलं असतं तर मला हे सगळं नसतं अनुभवता आलं. आपली मैत्री कधीच झाली नसती जी आता आहे." अभय म्हणाला.

"हो. तरी पण यार. एकदा तरी बोलायचं मला. मी किती काय काय बोललो तुला. काय चुकलं असेल तर माफ कर यार" निखिल भावनाविवश झाला होता.

"अरे निख्या, वेडा आहेस का साल्या तू. अपनी जान है बे तू. आणि तू असं बोलतोय. मैत्रीमध्ये काही नसतं असलं सॉरी वगैरे आणि गरीब श्रीमंत. फक्त असते ती जिवलग मैत्री. परत नको बोलू असलं काही " अभय त्याला समजवत म्हणाला. कारण त्याला माहित होतं कि, निखिलला हे सगळं माहिती पडल्यावर त्याला किती ऑकवर्ड वाटेल ते.

"हम्म." म्हणून निखिल शांत बसला.

          अभय त्याला इतर काही गमतीजमती सांगत होता त्याला. निखिलला एक एक गोष्ट समजत होती अभयबद्दल आणि मधेच बॉबी अंकल पण त्याला दूजोरा देत होते. मध्येच अभय म्हणाला,
"निखिल तुला बिजनेस करायचा आहे ना?"

"हो. का रे?"

"काही नाही. मला पण घेशील का तुझ्या बिजनेस मध्ये?"

"काय चेष्टा करतोय राव गरीबाची. तुला काय गरज रे."

"नाही असंच. सांगेन तुला नंतर काय ते." अभय म्हणाला.

"साल्या आणखी काय काय सांगणार आहेस तू काय महिती?" निखिल विचार करता करता म्हणाला. ते ऐकून अभय हसायला लागला.


     थोड्या वेळाने अभयने बॉबी अंकलला गाडी थांबवायला सांगितली. निखिलने गाडी का थांबवली असं विचारलं असता त्याचं उत्तर त्याला गाडीतून उतरल्यावर मिळालं. कारण अभयने ऋतिकाच्या वाड्याजवळ गाडी थांबवली होती. अभय आणि निखिल वाड्याकडे चालत निघाले.

"व्वा भाई. कॉल कर म्हटलं तर तू डायरेक्ट भेटायलाच आला कि तिला." निखिल म्हणाला.

"हो ना यार. काय करणार. कालपासून फोन ट्राय करतोय. पण उचलत नाहीय. आणि तेवढा वेळही नाहीय ना. म्हणून म्हटलं जाता जाता तिला सांगून जावं "

अभय आणि निखिल वाड्याजवळ पोचले. पण कोणी दिसत नव्हते तिकडे. त्यादिवशी सारखी माणसांची गर्दी पण नव्हती. एखाददुसरा दिसत होता. दाराजवळ पोचल्यावर अण्णा दिसले तिथेच खुर्चीवर बसलेले. पण ऋतिका कुठे दिसत नव्हती.
"नमस्कार अण्णा" अभयने त्यांना  नमस्कार केला.

"नमस्कार नमस्कार. कोण हवंय तुम्हाला." अण्णांनी अनोळख्या नजरेने पाहत त्यांना विचारले.

"अण्णा आम्ही. तुम्ही ओळखलं नाही का आम्हाला"

"नाही बाबा. कोण तुम्ही. नाही आठवत कोण ते?" अण्णांनी परत विचारले.

"आम्ही नाही का ते बाईकचा अपघात झालेला आमच्या आणि तुम्ही आम्हाला मदत केली होती. परत आम्हाला तुमच्या मुलीने मलमपट्टी केली होती. आम्ही थांबलो होतो थोडावेळ इकडेच." निखिल पुढे येऊन म्हणाला.

" हा हा आठवलं, ते दोघे तुम्ही आहेत होय. बसा बसा. ओळखलंच नाही तूम्हाला मी. खूप दिवसांनी बघितलं म्हणून पटकन लक्षात नाही आलं. बरे आहात ना आता " अण्णांनी शेवटी ओळख दिली. नाहीतर निखिलला अवघड वाटत होतं आता.

"हो. बरे आहोत आम्ही. तुम्ही कसे आहात?"

"हो एकदम मजेत. तुम्ही लोक इकडे कसं अचानक. काय परत गाडी कुठे ठोकली तर नाय ना?' अण्णांनी एकदम विचारलं.

"नाही नाही अण्णा. आम्ही इथूनच जात होतो. तेव्हा आठवलं आम्हाला. म्हणून म्हटलं आम्हाला मदत करणाऱ्या माणसांना परत एकदा भेटावं म्हणून. परत भेट होईल न होईल"

" हो. चांगलंय. आजकाल लोकं  त्यांना मदत केलेल्याना विसरतात लगेच. पण तुम्ही लक्षात ठेवलं ह्यातच सगळं आलं. " अण्णांना ऐकून बरं वाटलं.

"हो अण्णा." अभय म्हणाला.

"बसा थोडं. ऋतू येईलच इतक्यात. कॉलेज ला गेलीय. मग चहा वगैरे घेऊन जा तुम्ही."

"नको नको अण्णा. निघतो आम्ही. उशीर होतोय आम्हाला" निखिल मध्येच म्हणाला.

"अरे असं कसं नको. पाहुणचार न घेता कसं जाणार तुम्ही. लांब जायचं असेल तुम्हाला. चहा घेऊनच जा तुम्ही. बसा गुमान." अण्णा म्हणाले.

                               
           थोडावेळ बसले ते इकडच्या तिकडच्या गप्पा मारत. तेवढ्यात अभयला तेच जाणवू लागलं. हृदय जोरजोरात धडधडू लागलं. मन अस्वस्थ झालं. त्याने लगेच ओळखलं कि ऋतिका आलीय ते. आज एवढ्या दिवसानी त्याने असं धडधडणं अनुभवलं होतं. त्याने मागे वळून पाहिलं तर ऋतिका थेट अभयच्याच नजरेला नजर भिडवत हळुवार पाऊले टाकत येत होती. तिचं ते तसं येणं पाहून अभय आपसूकच उठून उभा राहिला. ऋतिकाच्या डोळ्यांत हरवून जायचा योग बऱ्याच दिवसांनी आला होता. अभय असा गमावणार नव्हता तो. अभय आणि ऋतिकाचा नजरेनेच संवाद चालू होता. ती त्याला नजरेनेच एवढे दिवसाच्या विरहाचं कारण विचारत होती तर अभय तिला नजरेनेच प्रतिउत्तर करत होता. दोघे एकमेकांच्या नजरेत खोलवर बुडाले होते. तोपर्यंत निखिलने  इकडे अण्णांना आपल्या बोलण्यात गुंतवून ठेवले होते.

   "आलीस तू ऋतू." अण्णांच्या आवाजाने ऋतिका भानावर आली. अभयपण बाजूला झाला.

"हो अण्णा."

"हे बघ, ह्यांना ओळखतेस का तू." अण्णांनी विचारले.

"हो हो अण्णा. चांगलंच ओळखते ह्यांना तर मी" ऋतिकाने तिखटपणे उत्तर दिले. तिला राग आला आहे आपला हे तिच्या बोलण्यावरून अभयला जाणवलं.  तसा तो डोकं खाजवत इकडे तिकडे बघू लागला.  ऋतिका तशीच अभयला धक्का मारून निघून गेली. ते चहा घेऊनच बाहेर आली. सगळयांना चहा देऊन ती परत आत गेली. चहा पिऊन झाल्यावर ते असेच गप्पा मारत बसले होते. गप्पा मारत असतानाच मधेच निखिल अण्णांना बाहेर वाडा बघण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. जेणेकरून अभय आणि ऋतिकाला प्रायव्हसी मिळेल. ते दोघे बाहेर गेले तसा अभय ऋतिकाला शोधू लागला. पण त्याला जास्त शोधाशोध करायची गरज नाही पडली. कारण ती तिथेच पडद्याआड उभी होती आणि तिनेच नजरेने निखिलला अण्णांना बाहेर घेऊन याला सांगितले होते.

       ऋतिका बाहेर आली तशी ती अभयवर तुटून पडली.
"मूर्खा, नालायक , बिनडोक तुला काही अक्कल वगैरे आहे कि नाही. किती छळशील अजून मला. किती दिवस वाट पाहायची तुझ्या फोनची. तुला एक साधा फोन पण करता येत नाही का नालायका?'

"अरे हो हो श्वास तरी घे कि, का सगळं शिव्यांचा स्टॉक  संपल्यावर शांत होणारेस." अभय तिला कसंतरी थांबवत म्हणाला.

"नाही होणार मी शांत. का होऊ?"

"मी म्हणतोय म्हणून"

"तू फोन का केला नाहीस एवढे दिवस मला ते सांग आधी."

"केलेला मी काल. पण तूच उचलला नाहीस. मग काय करू मी. म्हणून आज डायरेक्ट आलो तुला भेटायला." अभय पटकन म्हणाला. तसा तिचा राग मावळला.

"एवढ्या हक्काने भांडतेयस माझ्याशी?" अभयने सरळ प्रश्न केला.

"हो भांडणार मी, आहे माझा हक्..." बोलता बोलता ऋतिका मध्येच थांबली. काय होतंय आपल्याला आणि आपण काय बोलतोय हेच तिला कळलं नाही. आणि कळलं तेव्हा ती गोड लाजली. तिला तसं लाजताना पाहून अभय खल्लास.

"एवढ्याश्या ओळखीत एवढा हक्क. वा क्या बात है!" अभय म्हणाला.

"हो मग मैत्री मध्ये हक्क दाखवू शकतो ना आपण ?"

"हो. दाखवू शकतो ना. पण हा हक्क मैत्रीचा नाहीय. त्याहीपलीकडला आहे." अभय म्हणला.

"तुला काय माहित?"

"नाही माहित मला. पण जाणवतोय मला तुझ्यात. तुझ्या नजरेत. तुझ्या वागण्यात. तुझ्या बोलण्यात. तुझी माझी एवढ्या अनामिक ओढीने वाट पाहण्यात. माझ्याशी एवढं हक्काने भांडण्यात. सगळ्यांतच."

            ऋतिका ह्यावर काहीच बोलली नाही. फक्त लाल झालेल्या नाकाने अभयकडे बघत होती. तिला तसं बघून अभय हसू लागला तशी ती वरमली. त्याला मारायला त्याच्या अंगावर धावली. अभय बाजूला झाली आणि पाय अडकून पडणार तेवढ्यात अभयने तिचा हात पकडला आणि तिला सावरलं. त्याच्या हातातला हात पाहून ती लाजून आणखीनच लाल झाली. अण्णा कधीही येतील म्हणून तिने पटकन आपला हात सोडवून घेतला. आणि त्याच्या समोर मान खाली खालून उभी राहिली. अभयच्या खूप मनात येत होतं कि तिला आपल्या मिठीत घ्यावं, पण आता ती वेळ नव्हती. निखिल आणि अण्णा कधीही येऊ शकत होते.

"खरंय ना?" अभयने विचारलं.

"काय?" ऋतिका म्हणाली.

"तुझ्या मनातलं." अभय.

"तू ओळखलंस?" ऋतिका.

"जाणवलं मला ते" अभय.

"समजलं तुला " ऋतिका.

"उमजलं मला " अभय.

"काय आहे हे" ऋतिका.

"एक अनामिक ओढ" अभय.

"तुलाही आहे" ऋतिका.

" हो तुझ्याकडेच " अभय.

"ओळखीचं आहे" ऋतिका.

"अनोळखी वाटत नाही"  अभय.

"तुझ्यासाठीच आहे रे" ऋतिका .

"तुझ्याकडेच आहे" अभय

                   शब्दांचं युद्ध चालू होतं. आपल्यामध्ये जे काही होतं ते दोघेही जाणून घ्यायचा प्रयत्न करत होते. ओळखीच्या वाटत असलेल्या अनोळखी नात्याला दोघेही समजून घेत होते. खूप काही होतं पण नव्हतंही तेवढंच. या एवढ्याश्या भेटीत कितीसा गुंता सुटणार होता.

                    तेवढ्यात निखिल आणि अण्णा सुद्धा आले. पण त्यांना येताना बघून ऋतिका आधीच आत गेली होती आणि अभय तिथेच उभा होता. ते दोघे आत आल्यावर परत जाण्याची चर्चा चालू झाली.  दोघे जण त्यांचा निरोप घेऊन चालू लागले . तशी ऋतिका तिथे आली. तिच्या नजरेत जे काही होतं ते अभयला खूप अस्वस्थ करून गेलं. ह्या सगळ्याचा लवकर शेवट करायचा ठरवून अभय तिथून निघाला.

                   जाताना त्याने मागे वळून नाही पाहिलं कारण तिच्या नजरेतला तो अनामिकपणा त्याला तिच्याकडे खेचू पाहत होता. आणि आता ह्यावेळेस तरी ते शक्य नव्हतं. नेहमीसारखी याहीवेळेस भेट अर्धवट राहून गेली होती त्यांची. पण ती लवकरच पूर्ण होण्यासाठी. कारण अशा कित्येकी अर्धवट राहिलेल्या भेटीच शेवटी पूर्ण भेट घडवून आणतात. त्या अर्धवट राहिलेल्या भेटींची ती ओढच ते काम करत असते. 

To be continued in Part 5....

Sunday, April 12, 2020

अनोळखी हे प्रेम - Part 3



                 बसून बसून निखिल कंटाळला होता. रात्री लवकर निघायला हवं, कारण इकडे आपण पहिल्यांदाच आलोय आणि परत जाताना रस्ता भेटला पाहिजे. नाहीतर इकडेच अडकून पडावं लागेल. विचार करत तो अभयला म्हणाला,
"अभ्या, यार कधी निघायचं आपण. लवकर निघालं पाहिजे, नायतर इकडेच बसावं लागेल जंगलात अडकून."

पण अभयचं लक्ष होतंच कुठं त्याच्याकडे. तो आपला ऋतिकाच्याच विचारात होता. कारण ऋतिका भेटल्यापासून तो काही ह्या दुनियेत नव्हताच. राहून राहून तो थोड्यावेळापूर्वीचा सीन त्याच्या डोळ्यांसमोर येत होता. कसा आपला ऍक्सिडेंन्ट झाला आणि कशी ती आपल्याला परत भेटली. पण ती अचानक इथे कशी काय आली किंवा आपण इकडे नेमकं कसं काय पोचलो, ते त्याला पडलेलं कोडंच होतं. कदाचित देवानेच  आपल्याला मदत केली असणार, म्हणून मनोमन त्याने देवाचे आभार मानले.

त्याचं लक्ष नाही पाहून निखिलने त्याच्या डोक्यात टपली मारली,
"अभ्या, अरे काय म्हणतोय मी मघापासून."

"हा बोल, काय बोलतोय?" अभयने त्याच्याकडे लक्ष दिले आणि म्हणाला.

"च्यायला तुझ्या, झालं माझं बोलून. तुझं तर काय सगळं लक्ष तिच्याकडेच आहे. तू कशाला माझ्याकडे लक्ष देतोय आता." निखिल नाटकी आवाजात म्हणाला.

"नाहि रे निख्या बोल काय बोलत होता."

"अरे मी म्हणत होतो, आपण कधी निघायचं? का इथेच राहायचं तुझ्या सासरवाडीत? परत जायला नको का"

"हो निघूया ना थोड्यावेळाने. आता थोडं थांब कि, ऋतिका एवढ्या जवळ आहे माझ्या आणि तूला कसली घाई झालीय रं? बस गप्प आजून थोडा वेळ" अभय म्हणाला. त्यालाही तिथून निघू वाटत नव्हतं.

"बरं थांबू साल्या. पण काहीतरी कर ना तोपर्यंत. काय इथे बसून नुसता विचारच करत बसलाय. आता नशिबाने भेटलीच आहे ती तर, बोल ना तिच्याशी. थोडी ओळख वाढव."

"हो पण कसं ते. अरे इकडे बघ किती लोकं आहेत. ह्यांच्यासमोर कसं बोलणार तिच्याशी. तेही काही ओळख न पाळख. खूप मोठी लोकं आहेत वाटतं हि."

"एवढंच ना. इथल्या लोकांशी तुला काय करायचं आहे. कुठे आपण अशी तशी मुलं आहोत. चांगले डिसेन्ट आहोत." आपली कॉलर टाईट करत निखिल म्हणाला. त्याची टाईट केलेली कॉलर बघून अभय म्हणाला,

"आता पर्यंत डिसेन्ट दिसत होता पण साल्या आता पक्का टपोरी दिसतोय. कॉलर खाली कर गप्प" अभयने त्याची कॉलर हातानेच खाली केली.

"हा हा असू दे. ते जाऊ दे थांब, बोलवतो तिला मी. फक्त तू थोडं विव्हळायचं नाटक कर बाकी मी बघतो तिला कास बोलवायचं." असं म्हणून निखिल तिथून उठला आणि राम्याला शोधायला गेला. तोच फक्त ऋतिकाला बोलावून आणू शकत होता. कारण त्या एवढ्या मोठ्या वाड्यात तो कसं घुसणार होता. इकडे अभयला समजलं निखल काय करणार ते आणि तो ऋतिकाला परत बघायला भेटणार म्हणून गालातल्या गालात हसला.


      इकडे ऋतिकासुद्धा वेगळ्याच विचारात होती. बेडरूम मध्ये बेडवर पडल्या पडल्या ती मघाशी घडलेल्या घटनेचा विचार करत होती. 'हा मुलगा कोण आहे आणि ह्याला आपण ओळखतोय आधीपासून असं का वाटतंय मला. कारण आपण तरी कधी भेटलो नाही अगोदर. मग असं कसं? आणि त्याला लागलेलं पाहून आपल्याला का दुःख व्हावं? आपण का तळमळावं? त्याच्या वेदना पाहून आपल्याला का वेदना व्हाव्यात? विचित्र आहे सगळं. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. ती आपल्या ओळखीची आहे असं का वाटतंय आपल्याला? काहीच कळात नाहीय आणि सगळ्यात महत्वाचं, आपलं हृदय जे सकाळपासून नुसतं धडधडत होतं ते अचानक कसं शांत झालं त्याला बघून. काहीतरी आहे. शोधायला हवं. नाहीतर त्यालाच परत एकदा भेटून विचारावं. कदाचित त्याला काही माहीत असेल. ' ती विचार करत होती, तेवढ्यात तिचं खिडकीबाहेर लक्ष गेलं. ते दोघे आपसांत काही बोलत होते आणि  त्याचा मित्र इकडेच येतो. तिला शंका आली कि तो तिला बोलवायला तर नसेल आला ना? तिची शंका खरी ठरली. तो तिच्याकडेच येत होता. तिलापण सोपं झालं ते. मग तिने त्याच्याकडे जायचं ठरवलं.

        थोड्याच वेळात निखिल आला. पण ऋतिका नाही दिसली त्याच्यासोबत. म्हणून अभयने ती कुठाय हणून नजरेनेच विचारलं. तर निखिलने त्याला  इशाऱ्यानेच गप्प बसून ऍक्टिंग सुरु करायला सांगितली.  निखिल अभयच्या जवळ येताच त्याला ऋतिका घाईघाईने येताना दिसली.

"काय सांगितलं रे तिला? एवढ्या घाईघाईने का येतेय ती? " अभयने गोंधळून विचारलं.

"काही नाही जास्त सांगितलं. एवढंच बोललो कि तुला जास्त दुखतंय आणि परत रक्त येतंय तुझ्या जखमेतून" असं म्हणून निखिलने डोळा मारला. पण त्याचा परिणाम असा होईल असं नव्हतं वाटलं. कारण ऋतिका एवढ्या लवकर येईल हे नव्हतं वाटलं त्याला.

ती जवळ येताच तिच्या चेहऱ्यावरची काळजी अभयला स्पष्ट दिसली. तिचा चेहरा पाहून अभयला क्षणभरासाठी  असं वाटलं की, तिच्यासाठी आपण कोणी जवळचं आहोत. ती येऊन अभयच्या बाजूलाच बसली तसा निखिल उठून उभा राहिला.

"खूप दुखतंय का तुमचं. आणि बघू कुठे रक्त येतेय ते?" असं म्हणून ती अभयचा हात हातात घेतला.

"पायाला लागलंय ऋतिका. तुम्ही हात पकडलाय माझा" अभयने सांगितलं तेव्हा ती बावरली.

"अरे हो,  लक्षातच नाही माझ्या." तिने लाजून अभयचा हात सोडला आणि ती त्याची जखम पाहू लागली. पण काही रक्त वगैरे नव्हतं आलं. आपण मघाशी बांधून गेलो तशीच मलमपट्टी अजून आहे. हे बघून तिने एका डोळ्याची पापणी वर करून अभयकडे बघितलं. तसा अभय विव्हळू लागला. हे पाहून तिला हसूच फुटलं. 

"हे नाटक करायची काय गरज होती?" ऋतिकाने सरळ चोरीच पकडली त्याची. तिने सरळ अभयलाच विचारलं.
निखिल आपला प्लॅन फसला म्हणून इकडे तिकडे बघू लागला.
"नाटक....  नाही... मी नाटक नाही करत आहे. खरंच दुखतंय माझं" अभयने मान खाली घातली.

"कळतंय हो मला सगळं. मी वरतून सगळं पाहत होते. हा तुमचा मित्र काहीतरी बोलून तुमच्याशी रामूला शोधायला आला तेव्हाच ओळखलं मी. पण म्हटलं बघावं नेमकं काय कारण आहे ते, म्हणून मी काही न बोलता आले " तिने सांगितलं सगळं.

अभय आणि  निखिल तिच्याकडे पाहू लागले. म्हणजे तिला माहित असताना सुद्धा ती आली होती तर. निखिलला आलं लक्षात आणि आता आपण इथे थांबायची गरज नाही असं वाटलं, तो त्यांना प्रायव्हसी म्हणून मुद्दामच रामूला आवाज देत बाजूला गेला.

"अच्छा, म्हणजे तुम्हाला माहिती होतं का  मी नाटक करतोय ते" निखिल गेला तस त्याने ऋतिकाला विचारलं.

"हो" ती हळूच म्हणाली.

" मग तरीसुद्धा तुम्ही आलात? म्हणजे ... "अभयच बोलणं मधेच तोडत ऋतिका म्हणाली,
"म्हणजे असं कि, मी मुद्दामच आले तुम्हाला भेटायला." तिचं बोलणं ऐकून अभयला आश्चर्य वाटलं. तो तिच्याकडे पाहू लागला. तिने अभयच्या डोळ्यांत पाहत बोलायला सुरुवात केली,
" सकाळी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा बघितलं, तेव्हा मला असं वाटलं कि कोणीतरी ओळखीचं आहे. पण तुम्ही ओळखीचे वाटत नव्हता. पण मन म्हणत होतं कि, तुम्हाला कुठेतरी बघितलंय आणि आपण ओळखतो एकमेकांना. माहिती नाही का पण मी तेव्हापासून तुमचा विचार करतेय. आणि तुमच्याशी कसं बोलता येईल ह्याची वाट बघत होते. तर तुम्हीच स्वतःहून मला तो चान्स दिलात. थँक्स त्याबद्दल. आणि म्हणूनच मी आले घाईघाईने. पण येताना मी अशी का आले तेच कळलं नाही. तुमच्याबद्दल मला खुप काळजी वाटत होती. विनाकारणच. आश्चर्य आहे ना? ज्याला आपण याआधी कधीच भेटलो अगर पाहिलं नाही त्याच्याबद्दल एवढी काळजी का वाटावी? म्हणून मीच हैराण आहे. तुम्ही काही सांगू शकाल का ह्याबद्दल? "

अभय अजून तिच्याच डोळ्यांत पाहत होता. तिच्या बोलण्यात हरवून गेला होता. तिने परत विचारलं अभयला.
भानावर येत अभय म्हणाला,
"मला कसं माहिती असणार ऋतिका. मी पण पहिल्यांदाच भेटलोय ना तुम्हाला. " आपल्या मनातलं सुद्धा सांगावं तिला असं अभयला वाटलं. पण नको आताच. म्हणून त्याने टाळलं ते.

"हो ते पण आहे." ऋतिकाचा चेहरा पडला.  तिचा पडलेला चेहरा पाहून अभयला कसंतरी झालं. म्हणजे हि तळमळ फक्त आपल्याला नाहीय. तीसुद्धा आपल्यासाठी तळमळतेय जेवढं आपण तिच्यासाठी. हे पाहून अभयला खूप बरं वाटलं मनातून.

"बरं ते जाऊ द्या ऋतिका. आपण ह्या अगोदर भेटलो कि नाही ते आणि ओळखतो कि नाही तेसुद्धा आठवत नाहीय तुम्हालाही आणि मलाही. सो, आता आपण भेटलोय आणि ओळखायला लागलोय. हो ना?" अभयने ऋतिकाकडे पाहत तिला विचारले.

"हो. म्हणजे तसं नाही अगदी.  पण आपण भेटलोय आजच आणि लगेच ओळखायला लागलोय असं नाही म्हणता येणार ना" ती मस्करी करत म्हणाली.

"हा. पण आता आपण भेटलोय तर यापुढे ओळखू शकतो ना." अभय म्हणाला.

"चालेल.  पण त्यासाठी आधी आपल्याला मित्र व्हावं लागेल. " ऋतिका मनातल्या मनात हसत होती/ कारण तिलाही हेच हवं होतं.
"मग ना फ्रेंड्स आता आपण?" अभयने हात पुढे करत विचारलं.

"फ्रेंड्स" ऋतिका आनंदाने म्हणाली," आणि हे काय मघापासून तुम्ही तुम्ही म्हणताय तुम्ही. आता आपण फ्रेंड्स आहोत ना? मग हि फॉरमॅलिटी कश्याला?"

"नाही, ते आपलं असच" अभय डोकं खाजवत म्हणाला.

"असुद्या, पण आता तुम्ही वगैरे नाही बोलायचं. ऑड वाटतं."

"बरं ऋतिका. नाही म्हणत. पण तू हि अरे तुरेच म्हण. "

"हो  चालेल." असं म्हणत दोघे हसले.

                    अभयने तिचा हात हातात घेतलेला तसाच होता. ऋतिकाच्या लक्षात आले ते, तशी ती लाजली. पण काही बोलली नाही. कारण त्याचा तो स्पर्श तिला त्याच ओळखीचा वाटला आणि हवाहवासा देखील वाटत होता.  तेवढ्यात निखिल पण आला त्यांच्याजवळ.  तेव्हा तिने घाईघाईने आपला हात अभयच्या हातातून सोडवून घेतला. निखिलच्या नजरेतून हे सुटलं नाही.

"काय मग अभय, राहिलं का तुझं दुखायचं?" निखिलने डोळा मारत अभयला विचारले.

"हो. मग ऋतिकाने केलं नीट मला." अभय ऋतिकाकडे पाहत म्हणाला.  ती गालातल्या गालात हसली.

"हो का. बरं मग आता तू नीट झालाच आहेस, तर निघायला काही हरकत नाही आता. हो ना?"

"निघुयात ना थोड्यावेळाने" अभयने सांगितले.

ते लोकं निघायचं म्हणतायत हे ऐकून तिचा चेहरा उतरला. कारण कुठेतरी ऋतिकाला अभयचा सहवास आवडला होता. तो जाऊ नये असे तिला मनोमन वाटत होतं , पण त्यांना तसं सांगणं तिला बरोबर नव्हतं वाटत. कारणं खूप होती आणि सांगणार कोणाला?

"एवढ्यात निघताय?" न राहवून तिने विचारलंच.

"निघावं लागणार ना. कारण खूप लांब जायचं आहे आणि आम्ही इकडे नवीनच आहोत. त्यामुळे एकतर रस्ता शोधत जावं लागणार आहे. येताना आम्ही आलो असंच रस्ता दिसेल तसा, पण आता परत जायचा रस्ता शोधावा लागणार आहे आम्हाला." निखिलने सांगून टाकलं.

"गुगल मॅप आहे की, मग कशाला टेंशन घेताय." ऋतिका म्हणाली.

"हो, पण तरीसुद्धा. आता जर गेलो नाही तर परत कसं भेटणार ना आपण" अभय मध्येच म्हणाला. तसं ऋतिकाने चमकून त्याच्याकडे बघितलं.

"नाही म्हणजे आता गेलं पाहिजे आम्हाला असं बोलायचं होतं." अभयने लगेच सारवासारव केली.

"हम्म बरं चालेल. पण जेवण तर नाही करता येणार तुम्हाला कारण आताच निघायचं म्हणताय तुम्ही. निदान चहा तरी घेऊन जा. तेवढीच एनर्जी मिळेल तुम्हाला आणि आम्हाला पाहुणचारही करता येईल तुमचा. " ऋतिका काहीतरी कारण काढत म्हणाली. अभयला हेच हवं होतं. कारण निघायचा बहाणा केला नसता तर तसाच त्याला बोअर होत बसावं लागलं असतं तिकडे. यानिमित्ताने त्याला आणखी थोडावेळ थांबता येईल तिच्याजवळ.

  अभय लंगडत होता. एवढा वेळ एकाजागी बसून होता म्हणून काही जाणवलं नाही, पण आता चालताना त्याला दुखत होतं. निखिलने त्याचा हात खांद्यावर टाकून त्याला आधार देत चालायला लागला. पुढे ऋतिका आणि मागे हे दोघे चालत होते. वाड्यात पोचल्यावर बाहेरच ओसरीवर बसले सगळे. वर चढताना ऋतिकाने अभयला हात दिला होता. हे पाहून निखिल गालातल्या गालात हसत होता. रामूला अण्णांना बोलवायला सांगून ऋतिका चहा बनवायला निघून गेली. थोड्यावेळाने अण्णा पण आले. दोघांना बघून त्यांनी लगेच त्यांची विचारपूस केली. आणि त्यांच्यासोबतच बसले तिथे गप्पा मारत. एकूणच माणसं चांगली होती ती. एवढं सगळं केलं होतं त्यांनी ह्या दोघांसाठी अनोळखी असूनसुद्धा.

ऋतिका चहा घेऊन आली. चहा देऊन आपल्यासाठी एक कप घेऊन अण्णांच्या बाजूला बसली. आता निघायचं म्हणून ते सांगत होते त्यांना. निखिल बोलत होता त्यांच्यासोबत. इकडे अभय चोरून तिच्याकडेच बघत होता, हे तिला जाणवलं तसं तिने एक चोरटा कटाक्ष टाकला त्याच्यावर. दोघांची नजरानजर झाली तशी त्याने आपली कावरीबावरी नजर दुसरीकडे फिरवली.

 चहा पिऊन झाला तसं ते दोघे निघाले. त्या सगळ्यांचा निरोप घेत ते पायऱ्या उतरु लागले.
"खूप खूप थँक यु अण्णा तुम्हाला. कारण तुम्ही नसतात आज मदतीला तर माहिती नाही आम्ही तिथेच असतो अजून पडलेले. तुम्ही खूप मदत केलीत आम्हाला आणि आमच्यावर दवापाणी सुद्धा केलं लगेच. खरंच खूप थँक यु." अभय म्हणत होता.

"पोरांनो अरे मदत कसली त्यात. तुमचा अपघात झाला होता आणि तुम्हाला त्यावेळी मदतीची गरज होती आणि आम्ही ती केली. हे आमचं कर्तव्यच होतं. परमेश्वराच्या कृपेने जास्त काही झाली नाही तुम्हाला. आभार वगैरे काही मानू नका पोरांनो. गाडी नीट सांभाळून चालवा पोरांनो एवढंच. काळजी घ्या."  अण्णा म्हणाले.

 त्यांचा निरोप घेऊन ते निघालेच होते. आता ऋतिकाला परत ककसं भेटता येणार किंवा तिच्यासोबत कॉन्टॅक्ट कसा ठेवणार ह्या विचारात अभय चालत होता.  तेवढ्यात ऋतिकाने त्यांना आवाज दिला. सगळ्यांनी वळून तिच्याकडे पहिले. ती धावत अभयजवळ आली. तिने अभयच्या हातात कसलीतरी चिट्टी ठेवली आणि मोठयाने अण्णांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाली,"ह्या गोळ्या आहेत. रात्री जेवण झाल्यावर खा झोपताना." आणि हळूच अभयला "अभय प्लिज तू नकोस बाईक चालवूस. तू मागे बस. ह्याला चालवू दे बाईक. काळजी घे " ऋतिका काळजीने म्हणाली आणि अभयला स्माईल देऊन वळली.

 अभयच्या क्षणभर लक्षात नाही आलं काय ते. पण तिची स्माईल बघून तो समजून  गेला. निखिलला सुद्धा कळलं. समझने वाले को इशारा काफी है बॉस. गोळ्यांच्या बहाण्याने तिने तिचा मोबाईल नंबर अभयला दिला होता आणि कळू नये म्हणून जोरात म्हणाली होती गोळ्या खा म्हणून. अभयला हे सगळं खूप सुखावून गेलं.

   ते दोघे चालत बाईकजवळ आले, हेल्मेट आणि चावी बाईकलाच होती. कोणीतरी त्यांची बाईक आत मध्ये घेऊन आलं होतं.  निखिलने बाईकची हालत बघितली. पुढची हेडलाईट थोडी डॅमेज झाली होती आणि बाजूने थोडी घासली होती.  जास्त नुकसान नव्हतं झालं काही. निखिलने बाईक स्टँडवरून काढली आणि स्टार्ट केली. अभय मागे बसला. एवढा वेळ कोणी काहीच बोललं नव्हतं. निखिल ने पण अभयला डिस्टर्ब नाही केलं. थोडं पुढे आल्यावर अभयने मागे वळून पाहिलं तर ऋतिका खिडकीत बसून त्याच्याकडेच पाहत होती. अभयने तिच्याकडे पाहत हात हलवत स्माईल दिली. तिनेसुद्धा स्माईल देत त्याला बाय केलं. जणू काही ते खूप आधीपासून एकमेकांना ओळ्खतायत. 

        अभयच्या मनात सगळ्या गोष्टी तशाच साचल्या  होत्या सगळ्या. कारण एकामागून एक गोष्टी आज घडत होत्या आणि त्याला विचार करायला वेळ मिळाला नव्हता. जिच्याबद्दल त्याला एवढी ओढ होती तीसुद्धा त्याच्याकडे तेवढ्याच ओढीने आली होती. प्रेमाची ओढ होती ती. आणि  देवानेही  दोघांना आज भेटवलंच होतं. सगळं अवघड वाटत असताना कसं सगळं अचानक  सोपं झालं होतं. त्याच खुशीत अभय निघाला तिला परत एकदा भेटू या इच्छेने. निखिलसुद्धा खुश होता अभयला ती भेटली म्हणून आणि तिकडे ऋतिका सुद्धा काहीतरी नवीन  घडतंय आपल्या आयुष्यात म्हणून हरकून गेली होती. सगळं कस ओळखी ओळखीचं वाटत असूनसुद्धा अनोळखी होतं.

To be continued in 4th part.

Saturday, April 11, 2020

अनोळखी हे प्रेम - Part 2

                दुसऱ्या दिवशी निखिल अभय कडे आला. कॉलेजला सुट्टीच होती फायनल एक्झामच्या तयारीसाठी. त्यामुळे त्याचा काहीतरी प्लॅन होता बाहेर जायचा कुठेतरी. कारण अभ्यासाचं एवढं त्याला घेणंदेणं नव्हतं आणि अभयला त्याची गरजही नव्हती. त्यामुळे निखिलने त्यादिवशी झालेल्या सीनबद्दल आज अभयशी बोलायचं ठरवलं. म्हणून तो सकाळ सकाळीच त्याच्या घरी येऊन थबकला. अभय अजून अंथरुणातच लोळत होता, कारण काही काम नव्हतं. रात्री एक्झामची थोडीफार तयारी केली होती त्याने म्हणून आज तो कुठंतरी हिंडायला जाणार होता निखिलला घेऊन. तर इकडे निखिल स्वतःहूनच आलेला बघून त्याला बरं वाटलं.

" अभ्या, लेक अजून उठला नाहीस होय. चल ऊठ लवकर, जाऊ आज कुठंतरी बाहेर. जाम बोअर झालाय घरी राहून." निखिल तिथेच बसत म्हणाला.

"बरं झालं आलास. तसं पण आज माझं मन करत होतं बाहेर जायचं कुठंतरी. लेका शंभर वर्षं आयुष्य तुला. " उठून बसत अभय म्हणाला.

" हा मग, तुमनें याद किया और हम चले आये" हातवारे करत गाणं म्हणत निखिल म्हणाला.

"हो, तू थांब. मी  येतो फ्रेश होऊन." असं म्हणत अभय अंघोळीला गेला.


             थोड्यावेळाने ते दोघे बाईकजवळ आले. अभयने बाईक स्टार्ट केली, तसा निखिल मागे बसला आणि म्हणाला," चला मालक."

" कुठं जायचं निख्या."

" चल कुठंतरी, जाम दिवस झाले कुठं गेलो नाही बाहेर. तू बाईक घे मेन रोडला मग बघू कुठं जायचं ते"

ह्यादोघांचं हे नेहमीचं. कुठं जायचं ते माहीत नसतं. फक्त बाहेर निघायचं अन् पेट्रोल संपेपर्यंत भटकायचं. आणि जर कुठे जवळपास पेट्रोलपंप नसला की एकमेकांना शिव्या घालत बाईकला धक्का मारत पेट्रोलपंप शोधत राहायचं. म्हणून यावेळेस निघतानाच निखिल म्हणाला, "अभ्या, आताच पेट्रोल टाकून घे, परत मी नाही धक्का मारत बसणार" धक्का मारून काय हालत झाली होती लास्टटाईम हे आठवलं त्याला.

"हा बरं, चल पेट्रोल भरून घेऊ." असं म्हणत अभयने जवळच असणाऱ्या पंपाकडे बाईक वळवली. टाकी फूल करून घेत निघाले, पण ते बाईकलाच माहिती कुठं चालले ते. 


             सिटीमधून बाहेर पडल्यावर रहदारी कमी झाली. थोडं शांत वातावरण वाटू लागलं. कुठल्यातरी गावचा रस्ता लागला होता. अनोळखी नव्हता, पण इकडे कधी सहसा आले नव्हते ते. पण इकडे काय होणार आहे, ह्याची अभयला थोडीदेखील कल्पना नव्हती. तो त्यापासून पूर्ण अनभिज्ञ होता. शीळ वाजवत बाईक चालवत होता आणि मागे बसून निखिल हरियाळी बघत होता(?) त्या गावातली. ते गाव ओलांडून पुढं गेल्यावर रस्त्यात थोडा चढ लागला अन् घाट चालू झाला. आपण नवीनच कुठंतरी आलोय हे बघून निखिल म्हणाला,
"साल्या अभ्या, इकडे कुठं घाटात गाडी आणली रे.आणि एवढया लवकर कासाकाय घाट चालू झाला?"

"काय माहिती, पहिल्यांदाच आलोय इकडे आपण. थोडं गार पण वाटतंय, कदाचित इकडे पुढे नदी असेल बहुतेक." अभय ने आपला अंदाज बांधला.

"तू काय मॅन वरसेस वाईल्ड मध्ये कामाला होता काय रे, तुला काय माहिती पुढं नदी आहे का जंगल ते." त्याच्या तोंडाकडे पाहत निखिल म्हणाला.

"अरे निखिल, माझ्या मित्रा जंगलातल्या आणि नदीच्या गारव्यात फरक असतो. जंगलातला गारवा हा सुखावणारा असतो तर नादिवरच्या गारव्याने मन शांत होतं."

त्याचं बोलणं ऐकून निखिलने हात जोडले आणि म्हणाला,
"वा मेरे गुरू, काय फरक रे दोघांत, एकच ना दोन्ही? सुख काय अन् शांती काय दोन्ही एकच कि रे  "

"नाही रे, दोन्ही एकच नाही. सोड जाऊ दे तुला नाही कळायचं ते" असं म्हणून अभयने आपल्या बाईक चालवण्याकडे लक्ष केंद्रित केले. 

अभयच्या अंदाजाप्रमाणे खरंच पुढे एक नदी होती. घाट उतरल्यावर पायथ्याशी एक नदी आपल्या नादात मस्त वळण घेऊन पुढे जात होती. नदी जवळ आली तसं अभयने बाईक बाजूला घेऊन एका झाडाखाली उभी केली. निखिल उतरून तसच झाडामागे गेला. अभय नदीकिनारी आला आणि पायातले शूज काढून पॅन्ट वर करून गुडघाभर पाण्यात पुढे गेला. त्याला बघून निखिल पण तसाच आला त्याच्या मागे. नदीच्या थंड पाण्याने मस्त फ्रेश वाटत होतं. जवळच असणाऱ्या एका खडकावर अभय बसला. वाहत्या पाण्यात पाय सोडून पायाला स्पर्श करणारं ते नदीचं थंड पाणी आणि मधूनच पायाला गुदगुल्या करणाऱ्या त्या एव्हढाश्या लहान मासोळ्या, हे रिल्याक्सेशन अनुभवत होता. हा फ्रेशपणा कधीतरीच मिळतो अनुभवायला.

तिकडे निखिल तिथलेच लहान लहान खडे उचलून पाण्यात मारत भाकऱ्या खेळत होता. दोन... चार... सहा.. असे टप्पे काढत मजा घेत होता खेळण्याची. मध्येच निखीलचं अभय कडे लक्ष गेलं. त्याला तसा विचारमग्न बघून त्याला शंका आलीच, हे बेनं त्या मुलीचाच विचार करत असणार. दाखवत जरी नसला तरी, अभय नेहमी तिच्याच विचारात गुंग असे हल्ली. जेव्हापासून त्या मुलीला पाहिलंय, तेव्हापासून हे सटकलंय. सदानकदा तिचाच विचार. त्यामुळे आज त्याच्या मनातलं बाहेर काढायला निखिल त्याला बाहेर घेऊन आला होता. प्रेमात पडलेल्या माणसाच्या मनातून काय काढायचं म्हटलं की अवघडंच असतं हो.

"अभ्या, तुला ती मुलगी आठवतेय?" सहज बोलतो तसं निखिलने प्रश्न केला.

"कुठली रे? तसं पण तुला कुठल्या मुली आठवतात रे साल्या एक झाली की दुसरी, ती झाली की तिसरी. तुझ्या तुलाच आठवत नाहीयेत त्या मला कुठून आठवणार." अभयने त्यालाच उलट प्रश्न केला.

" अरे ये माणसा, मी माझ्याबद्दल नाही, तुझ्याबद्दल बोलतोय. तुला ती मुलगी आठवतेय का, ती त्या दिवशी पावसात भेटली होती. म्हणजे तू तिच्याकडे बघत होतास, पावसात तुम्ही दोघे भिजत होते. आणि तू तिच्या प्रेमात पडलास ती मुलगी? आठवलं?" निखिलने सरळ मुद्द्यालाच हात घातला.

"हो आठवली, पण मी कधी तिच्या प्रेमात पडलो रे साल्या?" अभय चाचपडला.

"हो ना. मग मी पडलो ना तिच्या प्रेमात? मीच सारखा विचारात असतो ना तिच्या? मीच त्यादिवशी तिच्याकडे येड्यासारखा बघत होतो ना? आणि आता सध्या पण मीच तिचा विचार करतोय ना? काय रे फुकणीच्या?" निखिल गरजला.

"हो... म्हणजे तसं नाही." आता याच्यापासून लपवता येणार नाही असं ओळखून अभय म्हणाला, 
" अरे म्हणजे, तसं प्रेमात वगैरे नाय रे पडलो तिच्या काय. आपलं असंच सहजच विचार करत होतो तिचा." अभयने सारवासारव केली.

"अरे हो की, फक्त विचार करतोस ना तिचा. तिच्या त्यादिवशीच्या फक्त दिसण्याने तू एवढा तिच्या विचारात बुडालाय. अरे चू** , ह्यालाच प्रेमात पडणं म्हणतात रे. त्या दिवशीच ओळखलं होतं. म्हटलं, सांगशील तू. पण कसलं काय लेका. तू तर अजून पण लपवतोय. खरं सांग अभ्या, तुला ती मुलगी आवडलीय ना, तिच्या प्रेमात पडलाय ना?" निखिल त्याच्या डोळ्यात बघत म्हणाला.

" हो... " बोलून अभय शांत बसला. त्याला काय बोलायचं सुचेना. निखिल फक्त त्याच्या कडे पाहत होता. हा कधी बोलतोय ते. आणि त्याने बोलायला सुरुवात केली,

"तुला माहितीय निख्या, त्या दिवशी पाऊस पडला होता,  त्या दिवशी माझं हृदय अचानक अस्वस्थ झालेलं आणि जोरजोरात धडकत होतं. ते विनाकारण नव्हतं. ते तिच्यासाठी धडकत होतं. कदाचित ती मला त्या दिवशी भेटणार होती म्हणून असेल. आणि ती दिसल्यावरच ते शांत झालं. मला माहीतही नाही ती कोण आहे? तिचं नाव काय? ती कुठं राहते? तिचं आणि माझं काय नातं आहे? का तिच्यासाठी माझं हृदय एवढ्या जोरात धडकत होतं? काहीच नाही महिती. तुझं बरोबर आहे, कि मी तिचा विचार करत असतो सारखा. पण मी प्रेमात वगैरे पडलोय का तिच्या? खरंच निख्या नाही माहिती रे मला." अभय मनातलं सांगत होता सगळं.

" हो अभ्या, लेका तू प्रेमातच पडलाय तिच्या. त्याशिवाय का तू एवढा तडपतोय तिच्यासाठी आणि ते पण ती कोण आहे हे माहित नसताना. साल्या तुझ्या जागी दुसरं कोणी असतं तर त्याला मी येडं समजून दोन चार शिव्या दिल्या असत्या. पण हे येडं आपलंच जिगरी आहे म्हणून काय करता नाही येत" कपाळावर हात मारून घेत निखिल म्हणाला.
"तुझ्यासाठी आपण शोधूया चल तिला. कुठं का असेना ती, कोण का असेना, तिला आपुन ढुंढ के लायेगा तेरे लिये " 


" हो" अभय ने स्माईल दिली. " तिला शोधायची गरज नाही रे निख्या, उलट तीच मला शोधत आलीय असं म्हण. त्यादिवशी जसं ती अचानक भेटली होती, तसंच आजही ती भेटेल असं मला वाटतंय आणि तेहि इकडेच जवळपास कुठंतरी. "

"काय बोलतो? म्हणजे आजपण तुला त्या दिवशी सारखा हार्टअटॅक आला का काय? " निखिल डोळे मिचकावत म्हणाला.

" नाही तसं  काही, पण मन म्हणतय माझं" अभय त्याच्या कडे पाहत म्हणाला.

"हो का. बरंय बरंय. अजून काय म्हणतंय बाबा तुझं मन" निखिल त्याची टेर खेचत म्हणाला.

अभयला कळलं तसं  तो म्हणाला,
"सध्या तरी ते म्हणतंय, काहीतरी खाऊन घेऊया. खूप भूक लागलीय"

"हो, म्हणजे आलं बाबा तुझ्या लक्षात. मला तर वाटलं तू तर आता उपाशी फिरवतोय का काय, आज तिच्या नादात." निखिल म्हणाला. त्याचं ते तोंड बघून अभयला हसायला आलं.

"चल बघू इकडे कुठे काय भेटतंय का ते. आपण आज नवीनच ठिकाणी आलोय वाटतं कुठंतरी. शोधावं लागेल आपल्याला जरा." पाण्याच्या बाहेर निघत अभय म्हणाला. तसा बघतो तर निखिल तर अगोदरच बाईक जवळ पोचला होता. चावी बाईकलाच होती. म्हणून निखिल जाऊन डायरेक्ट बसला. अभय मागे बसला तसं निखिलने बाईक स्टार्ट केली आणि ते कुठं काय खायला भेटतंय का ते शोधायला निघाले. पण इकडे अभयला त्याच्या मनात कुठंतरी असं वाटत होतं कि, त्या दिवशी सारखी आजही अचानकच भेटेल ती.


थोडं पुढे आल्यावर एक छोटा ढाबा दिसला त्यांना. निखिलने तिथेच बाईक घेतली. छोटाच होता ढाबा पण ऐसपैस होता. मोजकेच टेबल लावले होते. जास्त गर्दी नव्हतीच. एखाददुसराच बसलेला. इकडे जास्त काही मिळेल असं वाटत नव्हतं. पण जे काही मिळेल त्याच्यावर तुटून पडायचं त्यांनी ठरवलं.  कारण भूकच तेवढी लागली होती. खाऊन झाल्यावर निखिल बिल भरायला गेला. अभय बाइकजवळ आला. आता  थोडं भटकून परत निघायला हवं म्हणून त्याने निखिलला आवाज दिला. तो आल्यावर दोघे निघाले पुढच्या भटकंतीला.

   मस्त वाटत होतं. रस्ताच्या दोन्ही बाजूला गर्द हिरवी झाडं होती. त्या झाडांनी पूर्ण रास्ता झाकला होता. पलीकडं शेती होती. एकदम नॅचरल वातावरण होतं. तिथल्या झाडांमुळे त्या ठिकाणी मस्त गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे मघाशी जाणवणारं ऊन तिथल्या गारव्याने आता कमी लागत होतं. दोघे शांतच होते. तिथला गारवा अनुभवत होते. तेवढा पट्टा पार केल्यावर, पुढच्या वळणावर येताच अभयचं हृदय परत एकदा जोरात धडधडू लागलं. तोच अस्वस्थपणा परत जाणवू लागला. तोच बेदर्दीपणा जाणवू लागला.  म्हणून न राहवून अभयने जोरात ब्रेक दाबला. तसं पुढचं चाक तिथल्या मातीत घसरलं आणि बाईक हेलकावे खात जोरात पडली. अभयचा कंट्रोल सुटून बाईक बाजूच्या झुडपात घुसली.

            निखिल तिथेच आडवा आणि अभय हातावर जोरात घासत सुपरमॅन सारखा जमिनीवर लँड झाला. आता तर आपण बाईकवर होतो आणि अचानक जमिनीवर धूळ का खातोय हे निखिलला लवकर समजेनाच. आणि अभयचा का असा सुपरमॅन झालाय हे लक्षात येईपर्यंत त्यांच्या आजूबाजूला तिथल्या जवळ असणाऱ्या वाड्यातली आणि तिथं बाजूलाच शेतात काम करणारी माणसं धावतपळत जमा झाली होती. त्यांनी दोघांना उठायला मदत केली. एकाने झुडपांत घुसलेली बाईक बाहेर काढली.  त्यांचा ऍक्सीडेन्ट झालेला बघून त्यांच्यातला एक वयस्कर म्हणाला,
" अरे तुम्ही बघत काय बसलाय आणि ये राम्या तू काय नुसता त्याला पकडून उभा राहिलाय. लागलं असेल त्यांना, वाड्याजवळ आणा दोघांना. जास्त लागलं का बघू ते" तस त्या राम्याने अभयला त्याचा हात खांद्यावर घेऊन चालायला सुरुवात केली. जमलेली इतर लोकं पण त्यांच्या मागे निघाली.  अभयच्या पायाला मार लागला होता, म्हणून तो लंगडत होता आणि निखिल खाली पडायच्या आधी अभयच्या हेल्मेटवर जोरात डोकं आदळल्यामुळे आलेलं टेंगुळ चोळत होता. त्याला काही जास्त दुखापत नव्हती झाली.  त्यामानाने अभयला जास्त लागलं होतं. म्हणून तो डोकं चोळायचं सोडून अभयच्या सपोर्टला आला.

            ती लोकं वाड्याजवळ पोचली  तसे, एकाने त्याना बसायला बाज दिली आणि पाणी आणायला पळाला.  अभयला त्यावर बसवत सगळी घोळका करून उभी राहिली. निखिल आणि अभय मध्ये आणि त्यांच्या अवतीभोवती तिथली लोकं. पाणी पिल्यावर अभयला थोडं बरं वाटलं. तो तिथल्या लोकांकडे बघू लागला आणि ती लोकं हे दोघे कोण आहेत म्हणून ह्यांची  तोंड न्ह्याळात होती. अभयला अजून नेमकं काय झालंय आणि आपण इथे काय करतोय आणि ही माणसं कोण आहेत, हे काही कळेना. बाजूला निखिलला बघून त्याला बरं वाटलं. त्याने नजरेनेच त्याला विचारलं. पण तोही काही बोलला नाही.
तितक्यात त्या मघाच्या वयस्कर व्यक्तीचा आवाज परत आला.  आणि सगळे बाजूला झाले. त्यांनी प्रेमाने त्यांना विचारलं,
"पोरांनो कोण रं तुम्ही? आणि इकडं काय करत होतात? आणि तुमची गाडी कशी काय घसरली. नाही म्हणजे इकडे तस तुमची दुचाकी घसरण्यासारखं काहीच नाहीय म्हणून म्हटलं."

"माहिती नाही ओ काका, आम्ही इथून जात होतो, तर अचानक मध्ये काहीतरी आलं आणि म्हणून जोरात ब्रेक दाबला. त्यामुळे बाईक स्लिप झाली." निखिल म्हणाला. कारण अभयकडे बघून वाटत नव्हतं कि तो काही बोलेल म्हणून त्यानेच सांगून टाकलं. अभयने नुसतं मुंडक हलवलं.

"बरं, पण कुठल्या गावचं आहात तुम्ही. ह्या गावचं तर नाही वाटत." त्यांनी विचारलं.

"आम्ही पलीकडे शहरात राहतो. इकडे असंच फिरायला आलो होतो" निखिलने सांगितलं.

"बरं असं करा, थोडावेळ तुम्ही इथंच आराम करा. म्हणजे थोडं बरं वाटेल तुम्हाला. आणि मग जा तुमच्या प्रवासाला. थांबा माझ्या नातीला बोलावतो मी, ती डॉक्टरकीचं शिकतेय. तुम्हाला मलमपट्टी करेल म्हणजे तेवढाच आराम तुम्हाला." असं म्हणून त्यांनी राम्याला तिला बोलवायला सांगितलं.

अभयच हृदय अजून धडधडतंच होतं. ते का धडधतंय ते त्याला लवकरच कळलं. राम्या त्यांच्या नातीला घेऊन आला आणि अभय पाहतच राहिला. कारण ती तीच होती जिच्या साठी त्याच्या हृदयाने धडधडायला सुरुवात केली होती. तिला बघितल्यावर त्याला काय करावं काहीच सुचेना. तो आपला भान हरपून तिच्याकडे पाहत होता. त्या धुंदीतच तो उठून उभा राहिला. तेव्हा निखिलला आपला ऍक्सीडेन्ट का झाला त्याचं कारण कळालं. 
एवढा वेळ लंगडणारा अचानक कस काय उठून उभा राहिला म्हणून सगळे दचकलेच. अभयचं लक्ष नव्हते कोणाकडेच. ह्या सगळ्याचा विसर पडला होता त्याला. तो फक्त तिलाच पाहत होता.

ती एखाद्या हवेच्या झुळकीप्रमाणे त्याच्याजवळ आली. त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. तिच्यात काहीतरी असं खास होतं. ते अभय तिच्या डोळ्यांत पाहत होता. तोच  मनमोहक चेहरा, तेच गहिरे डोळे, तेच सौंदर्य. अभय तिच्या त्या डोळ्यांत  खोलवर बुडाला होता. बाकी त्याला काही आठवतंच नव्हतं ह्या क्षणी. ती आणि तो. सगळं अंधुक झालंय असं वाटत होतं. आणि आता तिच्या जवळ येण्याने त्याच हृदयहि धडधडायचं थांबलं होत. नव्हे सगळंच थांबलं होतं. चालू होतं तर फक्त नजरेचा संवाद. त्या दोघांच्या. एखाद्याच्या नजरेत हरवून जाणं काय असतं हे अभय त्या वेळेस अनुभवत होता.

"ऋतू" त्या आवाजाने अभय भानावर आला. आणि तशी तीसुद्धा वरमली. क्षणभर त्याला रागच आला. पण त्यांची ती नात आहे हे लक्षात येऊन तो वरमला आणि पटकन बाजेवर बसला. त्याची ती फजिती बघून ती खुद्कन हसली.

"बेटा, बघ ह्यांना जास्त लागलंय का? त्यांची पट्टी वगैरे कर बरं " असं सांगून ते निघाले. त्यांच्यासोबत बाकीची मंडळी सुद्धा निघाली. निखिलला तेवढंच बरं वाटलं. नाहीतर मघापासून तो नुसता घुसमटत होता त्या गर्दीमध्ये. इकडे त्यानेसुद्धा त्या मुलीला ओळखले आणि पुढे काय होणारे ते पाहू लागला.

" हो अण्णा." तिने हो म्हणून मान डोलावली. राम्या सोबत तिचा फर्स्टएड चा बॉक्स घेऊन आलेला. तो घेऊन ती अभयच्या जवळ बसली. तिने अभयचे पूर्ण निरीक्षण केले, कुठे आणि किती लागलाय ते बघितलं. आणि डेटॉल ने त्याची जखम पुसायला घेतली.

अभय तर सातवे असमानपर होता. त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. सकाळपर्यंत जिच्यासाठी तो व्याकुळ झालेला, आता तीच त्याच्या जवळ बसून त्याला झालेल्या जखमेवर मलमपट्टी करत होती. तिच्या स्पर्शाने आतून तो खूप सुखावला होता. आपलं नशीब किती भारीय, म्हणून मनोमन खुश झालेला. निखिल तर फक्त त्याची मज्जा बघत होता. ती काही एक न बोलता फक्त आपलं काम करत होती. तिचं अभयकडे लक्ष नव्हतं, पण  अभयने एक सेकंद सुद्धा तिच्यावरून नजर हटवली नव्हती. एव्हाना तिच्या हे लक्षात आलं असणार. म्हणूच तिने त्याची जखम बांधून झाल्यावर त्याच्या कडे फक्त एक तिरपा कटाक्ष टाकला.

"खरचटलंय खूप तुम्हाला, मी मलमपट्टी केलीय त्यावर. थोडावेळ आराम करा तुम्ही इथेच. एक पेनकिलर देते तुम्हाला मी." ती म्हणाली.

"हो" अभय कसातरी म्हणाला. त्याच्या तोंडून तो आवाज एवढा विचित्र निघाला कि ते ऐकून ती हसायलाच लागली. निखिलपण हसत सुटला त्याला बावचळलेला बघून. 

तिने आपला मोर्चा निखिलकडे वळवला. त्याला फारसं काही लागलं नव्हतं. पण डोक्याला आलेल्या टेंगळामुळे तो एकदम कार्टून वाटत होता. 

" तुम्हाला फारसं काही लागलेलं दिसत नाहीय, त्यामुळे काही मालमपट्टीची आवश्यकता नाहीय. एक पेनकिलर देते तुम्हाला. ती खा म्हणजे मुकामार जर लागला असेल कुठे तर जास्त ठणकणार नाही." असं म्हणून तिने त्याला एक गोळी खायला दिली. 


"तुम्ही दोघेही आराम करा थोडावेळ इथे आणि मी सांगितल्याशिवाय जाऊ नका. ओके." असं म्हणून ती जायला निघाली. पण काहीतरी आठवलायसारखं करून तिने अभयकडे बघितलं आणि म्हणाली,

"तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. आठवत नाही कुठे पण असं वाटतंय आपण कुठेतरी भेटलोय याआधी." 

अभय दचकलाच. च्यायला, हिला कसं माहिती आपण? त्यादिवशी हिने बघितलं कि काय आपल्याला आपण तिच्याकडे बघत होतो तेव्हा. म्हणून तर हि विचारत नसेल ना ?

"नाही, मला नाही वाटत आपण कधी भेटलो असेल." अभय पटकन म्हणाला. 

"हा असेल कदाचित. पण मला मनापासून असं वाटतंय कि आपण भेटलोय पहिले" ती आठवायचा प्रयत्न करत म्हणाली" जाऊ दे, नाही आठवत. बरं  तुम्ही आराम करा. मी येते." असं म्हणून ती निघाली. 

"एक्सक्यूज मी मिस... आपलं नाव? नाही म्हणजे तुम्हाला थँक यु म्हणायचं आहे. पण तुमचं नाव नाही माहिती ना. तुम्ही आम्हाला ओळखत सुद्धा नसताना आम्हाला एवढी मदत केलीत. आम्हाला एवढं काळजीने ट्रीट केलात, त्याबद्दल खरंच खूप मनापासून आभारी आहोत आम्ही." अभयला तिला जाऊ द्यायचं नव्हतं म्हणून तो वेळ काढत होता. 

"ऋतिका माझं नाव आणि काही थँक्स वगैरे म्हणायची काही गरज नाहीय एवढी प्लिज हा. कारण माझं ते कर्तव्यच आहे एक प्रकारे. अशावेळी मदत केली तरच मी एक चांगली डॉक्टर होऊ शकते ना. मी जर ओळखी अनोळखी करत बसले तर ते शक्य नाही ना " तिने आपलं नाव सांगून अभयला कारण स्पष्ट केलं. 

"नाईस नेम आणि स्वभावही खूप छान आहे तुमचा. बरं वाटलं तुम्हाला भेटून." अभय म्हणाला. 

"हो. गप्पा नंतर मारुयात आता तुम्ही अराम करा पाहू. मलाही अभ्यास करायचा आहे.  टेक केअर. रामू ह्यांना बघ काय हवं ते." ऋतिका रामूला त्यांच्याकडे लक्ष द्यायला सांगून गेली. 


अभय आणि निखिलने रामूला काही नको म्हणून सांगून त्याला घालवून दिला. निखिलने अभयकडे बघितले. आपल्या जिवलग मित्राच्या चेहऱ्यावरचं हसू बघून त्याला खूप बरं वाटलं. खूप दिवसांनी त्याला असं हसताना पाहून छान वाटलं. 

"अभ्या, लेका मी आहे कि रे इथे. असा काय हसतोय एकटाच? का ती भेटली म्हणून विसरला लगेच आपल्याला?" निखिल त्याच्याकडे पाहत म्हणाला. 

" नाय रे तुला नाही विसरत मी एवढ्यात. साल्या तुझ्याशिवाय आहे कोण मला. निख्या ती भेटली आज मला. बघ तुला म्हटलं होतं ना, ती आज भेटेल म्हणून. खरंच आज खूप खुश आहे मी. खूप खुश. ऋतिका भेटली आज माझी" अभय फक्त उड्या मारायचा बाकी होता. आता जर त्याला लागलेलं नसतं आणि ते लोक तिकडे नसते तर त्याने एवढ्यात नाचायला पण सुरवात केली असती. 

"हो माहितीय अभ्या. बघ तू एवढे दिवस ती तिच्यासाठी तरसत होतास आणि आज शेवटी ती स्वतःहूनच भेटली तुला. तुझी ऋतिका. नाव आणि स्वभाव पण खूप छान आहे पोरीचा. म्हणजे आपल्याला ओळखत नसताना पण तिने एवढं केलं आपल्यासाठी" निखिल म्हणाला. 

" हा निखिल. म्हणजे माझी चॉईस चुकीची नसणार हे माहिती होतं मला." अभय कौतुकाने म्हणाला. 

" हो बरोबर. अपने भाई कि चॉईस है, गलत कैसे होगी" निखिलने मान हलवली आणि मघाची घटना आठवून म्हणाला " नाहीतर आज आपलं काही खरं नव्हतं लेका. तू लंगडा आणि माझं टकलं  फुटलं असतं इकडेच. वहिनीने वाचवलं आपल्याला  " आणि हसायला लागला. 


                            निखिलपण खूष झालेला खूप त्याच्यासोबत. शेवटी आपल्या जिगऱ्याचं प्रेम त्याला भेटलं होतं. अभय तर जामच खुश झाला होता. कारण जिच्या भेटण्याची तो एवढी वाट पाहत होता आज ती अचानकच त्याला भेटली होती. निमित्त होतं ते झालेल्या ऍक्सीडेन्टचं. पण इतना तो चलता है ना यार. कारण कुछ पाने के लिए कुछ खोना तो जरूर पडता है. आणि तसंही देवाच्या मनात असणारच आज अभय आणि ऋतिकाला भेटवायचं. म्हणूनच देवाने आजचा दिवस नक्की प्लॅन केला असणार. म्हणूनच हे सगळं घडलं. खरंय, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी तयार असलो कि, ती गोष्ट आपल्याला नक्की भेटते. काहीही कारण असू दे मग.  शेवटी ती गोष्ट आपल्या आयुष्यात नक्की येते. मग एखादी व्यक्ती असो, एखादी घटना असो किंवा आपलं प्रेम असो. नक्की भेटतं.....!


To be continued in Part 3...............

Sunday, April 5, 2020

अनोळखी हे प्रेम... part 1

(टीप: हि कथा पूर्णपणे काल्पनिक असून कुठून ढापलेली किंवा कॉपी पेस्ट केलेली नाहीय. So read and enjoy the story.)

         प्रेम... म्हणजे?

सुरुवात तर अशी आहे. पण नेमकं प्रेम म्हणजे काय? खरंतर प्रेमाची व्याख्या ही काही एवढी अवघड नाहीय, पण त्याचं कसं आहे ना प्रेम हे त्यालाच कळतं जो कोणाच्या तरी प्रेमात पडतो. आणि मग स्वतःला विसरतो. मग ते आपल्या आवडत्या व्यक्तीच्या असो, स्वतःच्या असो किंवा इतर कोणाच्या असो. पण प्रेमाचं हे असं आहे. प्रेम हे कधी ओळखीच्या व्यक्तीवर होतं, कधी कधी अनोळख्या व्यक्ती वर होतं, तर कधी ओळखीच्या व्यक्तीवर होऊन सुद्धा ते अनोळखी राहतं कदाचित... आपणच त्याला ओळखायला विसरतो. जर ओळखायला आलं आपल्याला आपलं प्रेम तर क्या बात हैं..।

हे असंच काहीतरी आहे अभय च्या बाबतीत... Let's start the journey... अनोळखी हे प्रेम...



"अरे ये अभ्या, चल ना लवकर. साल्या बाईक चालवतोय का सायकल?" बाईक या बैलगाडीच्या स्पीड ला बघून निखीलची सटकली. आधीच उशीर झालाय कॉलेजला आणि त्यात हा अशी बाईक चालवतोय. त्याच्यामुळे मागून येणारी एक स्कुटी वाली त्यांना कट मारून पुढे गेली. तसा निखिल जोरात ओरडला,
" अभ्या, लेका ती एवढूशी पोरगी पण तुझ्यापेक्षा फास्ट चालवते रे स्कुटी."
तसा अभय म्हणाला
" अरे हो रे, पण तुला काय घाई रे एवढी कॉलेज ला जायची. फुकणीच्या कधी लेक्चर ला तरी बसलाय का कधी. फुकटात पोरी बघायला भेटतील म्हणून येत असतो" अभय आपलं बाईक चालवण्यावर लक्ष देत म्हणाला.
" हो, मग तुमच्या सारखं हुशार नाय ना रे मी, आणि लेक्चर ला बसलं की कोण ना कोण बाहेर काढत असतं मला सारखं म्हणून मीच नाय बसत लेक्चर ला." निखिल आपली केसं नीट उभी करत बोलला "जिकडे आपल्याला इज्जत नाय, तिकडे आपण कधी जात नाय." 

" हो ना, बाप सावकार आहे ना साल्या तुझा म्हणून असली नाटकं अंगात तुझ्या." अभय ने आपली टेर खेचली त्याची.

"हो मग आहेच आपला बाप सावकार. आणि तसं पण आपण काय शिकून तुझ्यासारखी नोकरी वगैरे करणार नाही, आपल्याच्याने नाय व्हायचं बाबा ते, आपण तर भाई बिझनेस करणार. " निखिल आपल्यातच मस्त होता.

"हा बे, थोडं दमाने घे. समोर बघ साल्या सासरा उभा आहे तुझा, आणि त्यात मी हेल्मेट नाही आणलाय." अभय ने बाईक स्लो करत म्हटलं. इकडे आजूबाजूच्या हिरवळीवरून लक्ष काढून निखिल ने अभयच्या बोलण्याकडे लक्ष दिलं, तर समोर सिग्नल ला त्याला दोन ट्रॅफिक पोलीस दिसले. तेव्हा त्याला कळलं की, अशा वेळी अभय कडून काही होणार नाही. आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर फुकट शंभर दोनशे ला चुना लागेल.

"एक काम कर अभ्या, तू उतर खाली. मला चालवू दे बाईक" निखिल चं ते बोलणं ऐकून अभय ला समजलं की, आता तो काहीतरी भन्नाट करणारे. गुपचूप बाईक साईड ला घेऊन त्याने निखिल ला बाईक चालवायला दिली.

" अब देख तेरा भाई क्या करता हैं." असं बोलून निखिल ने 1st गियर टाकला आणि जोरात रेस करत क्लच सोडला. तशी बाईक जोरात हिसका घेऊन पुढे गेली. अभय आपला मागे धरून आता निखिल काय करतोय ते मुकाट्याने बघत बसला. सिग्नल ला उभे असलेले हवालदार त्यांच्या कडेच बघत होते आणि आता हे लोक आपल्या तावडीत येतील म्हणून वाट बघत होते. पण कसलं काय. निखिल ने सिग्नल सुटला तसा बाजूने येणाऱ्या ट्रकच्या आडोशाने बाईक घेतली आणि तशीच पुढे नेली थोडी आणि पट्कन उजव्या बाजूला असणाऱ्या छोट्या गल्लीतून तशीच पुढे नेली. तिकडे ट्रॅफिक वाले येणारी आपली शिकार कुठे गायब झाली ते बघत होते. पण त्यांना कळेपर्यंत ही दोघे एव्हाना त्यांना हूल देत कॉलेज जवळ पोचली होती.

"हुश्श... निख्या साल्या. मरवशील एखाद दिवस. नीट चालवत जा रे बाईक जरा" अभय सुस्कारा टाकत बाईकवरून उतरला. आपण सुखरूप पोचलो हेच त्याच्यासाठी खूप होतं. करण निखिल बाईक चालवताना त्याची हवा टाईट होत असे. तशी तो सहसा निखिलला देत नाही बाईक चालवायला, पण काय करणार आज खिशात होते त्या पन्नासचं पेट्रोल टाकलं त्याने आणि जर हवालदाराने पकडलं असतं तर सेविंग ला ठेवलेले शंभर द्यावे लागले असते. आणि सोबत निखिल असल्यावर आपल्यावर अशी वेळ नाही येणार कधी, हे त्याला माहित होतं. कारण एक तर तो सॉलिड बाईक चालवतो, त्यामुळे त्याला कोणी पकडू शकत नाही आणि कधी पकडलाच त्याला कधी तर अशी काही इमोशनल स्टोरी सांगत असे की समोरचा हवालदार त्याला स्वतःकडचे पैसे देत असे मदत म्हणून.

" मी असल्यावर घाबरत जाऊ नकोस रे अभ्या, मै हू ना" निखिल अभयची अवस्था बघून म्हणाला. त्याने बाईक स्टँडला लावली आणि अभयकडे आला.

" हो ना, त्याचीच तर भीती आहे बाबा." अभय ने चावी घेतली बाईकची त्याच्याकडून, आणि ते कॉलेजकडे जाऊ लागले.

" अभ्या, थांब की लेका. कुठं चाललाय. बसू इथेच कुठंतरी." निखिल आपला मोर्चा जवळ असलेल्या गार्डन कडे वळवत म्हणाला.

" अरे नको निख्या, मला जाऊ दे लेक्चर ला, आज मॅडम काही नोट्स देणारेत. ते बघू दे जरा." त्याला परत खेचत अभय निघाला.

" हा जाऊ, पण साल्या अभ्या तुला कधीपासून गरज पडली रे मॅडम च्या नोट्स ची.  च्यायला मला तर फुल्ल डाऊट आहे त्या मॅडमच्या अन् तुझ्यात. साला सारखी अभय अभय करत असते." निखिल त्याच्या कडे बघत म्हणाला. ते ही बरोबरच होतं म्हणा. कारण अभय जन्मजातच खूप हुशार होता. त्याला असं नोट्स वगैरेच्या बाता करताना ऐकून निखिलला त्याच्यावर संशय येणं स्वाभाविकच होतं. त्याला तर आपल्या मित्राच्या हुषारीचा अपमान झाल्यासारखं वाटलं.

" नाही रे तसं, काहि महत्वाचं आहे एक्सामबद्दल, मला काय गरज पडलीय त्या म्हातारीसोबत लफडं करायची. चल आता लवकर" अभय तसाच पुढे चालत म्हणाला. निखिलही तसाच त्याच्या मागे.

गेटजवळ पोचल्यावर बघतो तर गेट बंद आणि त्यात तो वॉचमन असा काही ह्या दोघांकडे बघत होता जसं काही ते त्याच्या मुलीचा हातच मागायला त्याच्याकडे आलेत. त्याने तुच्छतेने हाकलून देण्याअगोदर अभय निखिलला म्हणाला, " चल बाबा, तू म्हणत होतास तिकडे, हे येडं काय आपल्याला आत सोडणार नाही, आपण थांबून काही उपयोग नाही. थोडावेळ बसूयात बाहेर चल."

"च्यायला ह्या वाचमनच्या, ह्याला एक दिवस ठोकतोच बघ, आता देतोय तो हाकलून आपल्याला, पण नंतर परत सलाम ठोकेल बघ तो." असं म्हणून त्याने दोन चार शिव्या हासडल्या त्या वाचमनच्या नावाने.आणि येऊन बसले ते दोघे परत गार्डन जवळ.

गार्डन पण बंद होतं. म्हणून बाहेरच बसले ते बाकड्यावर एका. 

" दोन कडक कटिंग दया काका पट्कन, तेवढाच मूड चांगला होईल" चहावाल्याला दोन चहा सांगून निखिलने आपली सिगारेट पेटवली आणि आपल्या सायलेन्सर मधून धूर काढत तो अभय कडे वळला.

अभय... एक हुशार, शांत, मॅच्युअर, हसरा, दिसायला हँडसम वगैरे काही नसला तरी, कोणी पहिल्या नजरेतच त्याच्याकडे आकर्षित व्हावं असा होता. बोलणं आटोपशीर, जशास तसं. आपल्या बोलण्याने तो एखाद्याला निरुत्तर वगैरे करू शकत होता, असं लॉजिकल बोलणं. अंगकाठीने काही पहिलवान वगैरे काही नव्हता, पण अंगावर कोणी आल्यावर त्याचं तगडे मोडून देऊ शकत होता. कमी आणि सडेतोड बोलणं आणि सोबत तीक्ष्ण नजर रोखून धरणं त्यामुळे जास्त कोणी त्याच्यासमोर लढत नव्हतं. हे थोडक्यात अभयबद्दल. 

आणि आपला निखिल, एकदम विरुद्ध. शांतपणा वगैरे तर त्याच्या आसपास नव्हता कुठे. बोलताना काही नाही, डायरेक्ट भिडण्याचा प्रकार. मारामारी करायला तर केव्हाही तयार. समोरचा फक्त काही उलट बोलायची वेळ फक्त, की हा पडलाच तुटून त्याच्यावर. पर्सनॅलिटी तर एकदम झक्कास. एकदम हिरोच. तीन चार जणं जरी एकत्र आले तरी त्यांना पुरून उरेल एवढा जोर अंगात, पण डोक्याने तेवढाच कमजोर. अक्कल तर एकदम चायना माल सारखीच. चली तो चाँदतक, नहीं तो शामतक. पण कसाही असला तरी जीवाला जीव देणारा. माणुसकी ठासून भरलेली अगदी, त्याच्या इतर गुणांविरुद्ध. 

असे हे दोघे होते. कधी आपली ओळख झाली, हे दोघांनाही सांगता येणार नाही. हो पण एव्हढी घट्ट मैत्री दोघांची, की जर तिसऱ्या कोणी त्यांच्यात फूट पडायचा प्रयत्न केला तर त्याच्या टांगड्याच गळ्यात डायरेक्ट. एमेकांवर खूप जीव दोघांचा. विश्वासही खूप. जय विरु. अभय खूप जीव लावायचा निखिलला. त्याला कोणी नव्हतं निखीलशिवाय. निखीलपण अभय वर जीव ओवाळून टाकायचा, अभयला साधं खरचटलं तरी तो ज्याच्यामुळे खरचटलं त्याचा बंदोबस्त करायचा पूर्ण. अशी त्यांची मैत्री, यारी, दोस्ती एकदम झक्कास होती.

चहा पिताना अभय म्हणाला,
" यार निखिल, आपली 12th तर झाली इकडे, आता ग्रॅज्युएशन पण होईल या वर्षी. मग पुढे काय करायचं रे."

" काय करायचं म्हणजे, आपलं तर ठरलंय अभ्या, मस्त बिजनेस वगैरे चालू करेल. एखादं हॉटेल वगैरे टाकेल मस्त. तुझ्या सारखं नोकरी बिकरी नाय करणार" निखिल सिगारेटचा धूर हवेत सोडत म्हणाला.

" कोण म्हणालं की मी नोकरी वगैरे करणार आहे. मित्रा हे नोकरी प्रकरण आपल्या रक्तात नाहीय." अभय त्याला धुडकावत म्हणाला.

" मग लेका,  काय करायचं म्हणतोस?" न कळून निखिलने विचारलं.

"सांगेन, तुझ्यासाठी एक सुरप्राइझ आहे खास. आपलं ग्रॅज्युएशन झालं की चल माझ्यासोबत फक्त." अभय एक डोळा मिचकावत म्हणाला.

" कुठं रे? कुठं काय खजाना वगैरे शोधायचा प्लॅन करतोय का?" 

"नाही रे निख्या, लेका तू फक्त चल माझ्यासोबत. घरी सांगून ठेव फक्त की, माझ्यासोबत येतोय म्हणून. म्हणजे तुला कोण जास्त विचारणार नाहीत.

" बरं." असं म्हणत त्याने हातातलं सिगरेटचं थोटुक विझवलं आणि चहाचे पैसे द्यायला गेला.

बराच वेळ झालेला कॉलेजकडे येऊन. पण अभय अन् निखिल अजून लेक्चर ला नव्हते गेले. चहा पिऊन झाल्यावर दोघे तिथेच गप्पा मारत बसले. आज काही वेगळं घडणार हे अभयला सकाळपासून वाटत होतं, पण नेमकं काय ते कळत नव्हतं. आणि त्यातच पावसाळ्याचे दिवस नसताना सुद्धा ढग भरून आले होते. त्यामुळे अभयच्या मनात जास्तच विचारांचं काहूर माजलं होतं. अचानक झालेल्या वातावरणबदलामुळे तो एकदम अस्वस्थ झाला. त्याचं हृदय एकदम जोरात धडधडू लागलं. त्याला असं बघून निखिल म्हणाला,
"काय रे अभ्या, काय झालं? असा का बसलाय? आणि अचानक काय झालं तुला? कसला विचार करायला लागलाय?"

"माहिती नाही यार, असं अचानक कसंतरी व्हायला लागलंय. म्हणजे नेमकं कळत नाहीय, पण काहीतरी विलक्षण घडणार आहे असं वाटतंय" अभय आपल्या छातीवर हात ठेवून उभं राहत आभाळाकडे बघू लागला.

"अरे ये माणसा, जरा शुभ शुभ बोल. असली ऍक्शन काय करतोय तू, काय हार्ट अटॅक वगैरे आलाय का काय?" 

अभय हसला आणि त्याने ती पोज बदलली आणि बोलला,
"नाही निख्या, पण एकदम विचित्र वाटतंय. असं पाहिलं कधीच नव्हतं वाटलं. असं वाटतंय काही तरी असं घडणार आहे लाईफ चेंजिंग काहीतरी. तुला नाही का काय वाटत हे वातावरण बघून"

निखिल त्याच्याकडे बघत होता. हे बेनं असलं काय बोलतंय ह्याचा अंदाज घेत होता. पण काही कळत नव्हतं त्याला. न राहवून तो म्हणाला,
"हे बघ अभ्या, आधीच हे असलं वातावरण तयार झालय आणि तू हे असलं फालतू काही बोलू नकोस. असल्या वातावरणाचा माझ्यावर परिणाम व्हायला मी काय ससा आहे का, की आभाळ पडलं म्हणून पळायला."

"तसं नाही रे, पण... जाऊदे च्यायला" काही बोलायचं न समजून अभय तसाच उभा राहिला.

आणि अचानक विजा कडकडायला सुरुवात झाली. जोरात वारा सुटला आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे सगळ्यांची धावपळ उडाली. सगळे इकडे तिकडे पळायला लागले. आडोसा शोधायला लागले. पण अभय मात्र तसाच दोन्ही हात पसरून डोळे बंद करून वरती बघत पावसात उभा राहिला. निखिल पण आडोशाला पळाला.अभय ला तसं बघून तो काही बोलला नाही. फक्त त्याच्याकडे बघत होता. कारण त्याला माहित होतं, त्याला पाऊस किती आवडतो ते. पावसात भिजायला तो काहीही करेन. त्याला 
जर आता अडवायला गेला  असता तरी तो आला नसता. म्हणून त्याला  अडवायच्या भानगडीत न पडता तो पावसापासून वाचण्यासाठी टपरीच्या इथे जाऊन उभा राहिला.

 अभय तसाच डोळे बंद करून उभा होता पावसात. त्याच बाहेरच्या जगाकडे लक्षच नव्हतं. तो आपल्याच धुंदीत पावसाचे थेंब अंगावर झेलत शांत उभा होता. असं  किती बरं वाटतं ना बाहेरच्या जगाची पर्वा न करता फक्त आपल्या धुंदीत जगणं. तेवढ्यात त्याच्या कानावर कुणाच्या तरी नाजूक हसण्याचा आवाज आला. क्षणभर तो तसाच कानात घुमला. पण भास असावा म्हणून त्याने लक्ष नाही दिलं. पण परत तेच नाजूक खिदळणं त्याच्या कानावर पडलं, तसे त्याने डोळे उघडले आणि त्या आवाजाच्या दिशेने पहिले आणि पाहतच राहिला. कारण कोणीतरी आणखी अभयसारखंच त्या पावसाचा आनंद घेत होतं. फरक इतकाच कि अभय एकटाच आपल्या विश्वात होता आणि ती व्यक्ती तिथल्याच २ - ४  लहान पोरांसोबत पावसाच्या पाण्यात उड्या मारत आनंद वाटत होती. अभय पाहतच राहिला, कारणहि तसंच होतं. ती जी कोणी होती, अभयचं हृदय तिने केव्हाच पळवलं होतं. कारण ती पावसात भिजताना अक्षरशः वर्षाराणी वाटत होती. होच. तिच्याकडे अभय भान हरपून पाहत होता. पावसात भिजणारी ती आणि तिच्या कडे पाहणारा अभय. एवढंच.

पाऊस जोरदार होता, मन भरून कोसळत होता. विजांचा कडकडाट होताच सोबतीला. आणि त्यात हे दृश्य. अभय आणि ती. अभय स्तब्ध होता. त्याची फक्त नजर तिच्या कडे पाहत होती. तिला आपल्या डोळ्यात सामाणसाठवून घेत होता तो. आणि ती. पावसाने तिचे पूर्ण शरीर चिंब भिजले होते. तिचा तो फिकट गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि तो गोरापान रंग पावसात भिजून आणखीनच विलोभनीय दिसत होता. मोकळे सोडलेले केस आणि  कपाळावर लावलेली एवढीशी टिकली तर कहर करत होते. काळेभोर गहिरे डोळे त्यांना सांगड घालत होते. साधंच पण मनमोहक सौंदर्य ते. त्यावर तिचं हसणं तर... वा...

त्या पावसात भिजताना ती आपलं भान हरपली होती. पाऊस चालू झाल्यावर कधी आपल्या गाडीचा दरवाजा उघडून ती बाहेर आली, तिलाच कळलं नाही ते. तिकडून मागून तिची आई तिला आवाज देत होती. लवकर गाडीत ये म्हणून सांगत होती. पण तिचं लक्ष होतंच कुठे. ती तर आपल्याच विश्वात होती. इकडे अभय पण तिच्या कडेच पाहत होता.

पावसाचा जोर अचानक आला तास ओसरला. आणि ती पण. पाऊस थांबल्यावर तिची आई येऊन तिला घेऊन गेली गाडीकडे. तिने त्या मुलांना बाय करत पुन्हा भेटू म्हणून निघून गेली. अभय मात्र तसाच उभा होता अजून. निखिल हा  सर्व प्रकार पाहत होता. अभयचं काय झालं हे त्याला समजून चुकलं. तो तसाच अभय कडे आला. तर तो अजून ती मुलगी गेली त्या दिशने पाहत होता. त्याने त्याच्या डोळ्यांसमोरून हात फिरवला तरी त्याच लक्ष नाही. तो तसाच. मग मात्र निखिलने अभयच्या डोक्यात जोरात टपली मारली. तसा तो भानावर आला.

" काय रे ये? काय झालं? असा काय पाहत होता तिच्या कडे? कोण होती ती मुलगी?" निखिलने विचारलं.

" कक्क कोण ..... मुलगी...... ????" अभय शुद्धीवर येत म्हणाला.

"अरे तीच, जिच्या कडे आता तू बघत होतास एवढे डोळे फाडुन."

" माहित नाही कोण आहे ते " अभय तसाच बोलत होता.

" बरं, चल असू दे. चहा पिऊ आणखी एक चल. भिजलायस पावसात तू."

निखिलने कपाळावर हात मारला. ह्याची तर विकेट पडली होती हे त्याने ओळखले. म्हणून तो आता तरी काही बोलला नाही. आणि ते दोघे टपरीकडे आले. आणि चहा घेतला. निखिल सुद्धा अभयला काही बोलला नाही. तो आपला चहा घेऊन गप्प उभा राहिला. कारण अभय ला आता छेडून काही उपयोग नव्हता. ते कारट त्या मुलीचाच विचार करत असणार हे त्याने ओळखलं आणि तो आपला मुकाट्याने बाजूला उभा राहिला. थोड्या वेळाने बघू त्याच्या कडे.


            सगळं पहिलं होतं तसं झालं. पूर्ववत. पण अभय मात्र अजून तिथेच होता. 'कोण असेल ती? हाच विचार होता त्याच्या मनात. आजवर एवढ्या मुली पहिल्या, पण अशी जादू आज पहिल्यांदाच. अच्छा.. म्हणून आपलं हृदय मघाशी एवढं जोरदार धडधड करत होततर. मन अस्वथ झालेलं ते ह्यासाठी. पण आपलं हृदय तिच्यासाठीच का धडकावं. कोण  होती ती? आणि अशी अचानक येऊन कशी काय गायब झाली.' अभय आपल्या विचारात होता.


कोण होती ती मुलगी? काय होईल आता अभयचं? निखिल काही बोलेल का ? ह्या सगळ्या गोष्टी आता पूढच्या भागात....

To be continued.... Part २


- By Prabhakar Waghmare